Homeबॅक पेजयंदाचा संरक्षण वार्ताहर...

यंदाचा संरक्षण वार्ताहर अभ्यासक्रम विशाखापट्टणमला सुरू

संरक्षण मंत्रालयाद्वारे, राष्ट्रीय आणि प्रादेशिक माध्यम संस्थांमधील निवडक पत्रकारांसाठी आयोजित, तीन आठवड्यांचा संरक्षण वार्ताहर अभ्यासक्रम  (DCC) 2023, नुकताच पूर्व नौदल कमांड (ईएनसी), विशाखापट्टणम येथे सुरू झाला.

व्हाइस अॅडमिरल समीर सक्सेना  एवीएसएम, एनएम चीफ ऑफ स्टाफ, ईएनसी  यांनी उद्घाटनपर भाषण केले. संरक्षण मंत्रालयातील प्रवक्ते आणि अपर महासंचालक (माध्यमे आणि संज्ञापन) ए भारतभूषण बाबू यांनी सागरी युद्ध केंद्रातील संरक्षण पत्रकारिता अभ्यासक्रमाची माहिती दिली. या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट माध्यमे आणि सैन्य यांना परस्परांच्या अधिक जवळ आणणे आणि सर्व स्तरावर पत्रकारांना सशस्त्र दलांच्या कामगिरीचे अधिक चांगले आकलन व सागरी वृत्तांकनासाठी सक्षम करणे, हे आहे.

एक आठवड्याच्या अभ्यासक्रमादरम्यान, सहभागींना नौदल आणि तटरक्षक दलातील विषयतज्ज्ञ माहिती देतील. ते पत्रकारांना नौदलाच्या नौदल संचालन, नौदल कूटनीती, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण, नौदल आणि तटरक्षक दलाची संघटनात्मक रचना यासह नौदलाच्या विविध पैलूंबाबत अवगत करतील. अभ्यासक्रमांतर्गत सहभागींनी 21 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय नौदल जहाज आणि पाणबुडीला भेट दिली. जहाजावर राहण्याच्या अनुभवाबद्दल त्यांना माहिती देण्यात आली.

या आठवड्यात विशाखापट्टणम येथे तटरक्षक दलाची जहाजे, नौदल डॉकयार्ड, नौदल हवाई केंद्र येथे सहभागींचा नियोजित दौरा आहे. समुद्रात भारतीय नौदलाच्या अग्रणी युद्धनौकेवरून नौदलाच्या सागरी मोहिमांविषयी जाणून घेणे, हे या टप्प्यातील अभ्यासक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content