Homeन्यूज ॲट अ ग्लांसक्रिकेट विश्वचषक जिंकलाः...

क्रिकेट विश्वचषक जिंकलाः प्रतिका, स्नेह, रेणुकाला रेल्वेकडून बढती!

महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू प्रतिका रावत, स्नेह राणा आणि रेणुका सिंह ठाकूर यांना भारतीय रेल्वेकडून विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या नामवंत महिला क्रिकेटपटूंना, विशेष बाब म्हणून (Out-of-Turn Promotion) पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीच्या माध्यमातून रेल्वेने या तीनही महिला क्रिकेटपटूंनी 2025च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या महिला विश्वचषक स्पर्धेतील, भारताच्या विजयात दिलेले उत्कृष्ट योगदान आणि कामगिरीचा गौरव केला आहे. या तिघींनाही विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या गट ब, अधिकारी श्रेणीच्या पदावर पदोन्नती दिली गेली आहे.

या तिन्ही खेळाडूंना सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या वेतन संरचनेनुसार स्तर 8 अंतर्गत गट ब राजपत्रित अधिकाऱ्यांचे वेतन आणि लाभ मिळणार आहेत. रेल्वे क्रीडा प्रोत्साहन मंडळाच्या या उपक्रमातून या महिला क्रिकेटपटूंना आर्थिक सुरक्षेसोबतच, प्रशासकीय जबाबदाऱ्याही सांभाळण्याचा मानही प्राप्त झाला आहे. उत्तर रेल्वेमध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेली प्रतिका रावतला आता विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या गट ब राजपत्रित पदावर पदोन्नती मिळाली आहे. दिल्लीची सलामीची फलंदाज रावतने विश्वचषक स्पर्धेच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. उत्तर रेल्वेमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेली रेणुका सिंह ठाकूरलाही आता विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या गट ब राजपत्रित पदावर पदोन्नती मिळाली आहे. उजव्या हाताची मध्यम-वेगवान गोलंदाज ठाकूरने महत्त्वाच्या सामन्यांमध्ये निर्णायक गोलंदाजी करून सातत्याने सामना जिंकून देणारी कामगिरी केली आहे. उत्तर रेल्वेमध्येच व्यावसायिक सहतिकीट लिपिक म्हणून कार्यरत असलेली स्नेह राणा आता विशेष कार्य अधिकारी (क्रीडा) या गट ब राजपत्रित पदावर कार्यरत राहील. उत्तराखंडची अष्टपैलू खेळाडू राणाने फलंदाजी आणि गोलंदाजी असे दोन्हीत महत्त्वाचे योगदान दिले आहे.

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content