Homeमुंबई स्पेशलचला देऊया मदतीचा...

चला देऊया मदतीचा एक हात.. नगरसेवक संदीप पटेल

रत्नागिरी जिल्ह्यात सतत चाललेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर चिपळूणसारख्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपण सारेच समस्त चिपळूणकरांसाठी प्रार्थना करत आहोत. या प्रार्थनेसोबत आपण जर प्रयत्नांची साथ दिली तर समस्त चिपळूणवासियांना ह्याचा खूप मोठा आधार होईल. म्हणून आपण सर्वांनी लागणाऱ्या प्राथमिक वस्तू चिपळूणकरांसाठी दान करून त्यांना बळ देऊ, असे आवाहन गोरेगावातले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संदीप पटेल यांनी केले आहे.

तौक्ते चक्रीवादळमुळे कोकणात झालेल्या नुकसानग्रस्त भागातील बांधवाकरिताही नगरसेवक पटेल यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टीच्या वॅार्ड क्र. ५८तर्फे मदतीचा हात देण्यात आला होता.

जनतेने मदतीसाठी लागणारे साहित्य जसे की, टूथ ब्रश, टूथपेस्ट, साबण (कपड्याचा/अंघोळीचा), पॅकिंग पिशव्या, गार्बेज बॅग, सॅनिटरी पॅड, टॉवेल, चादर, मच्छर अगरबत्ती, मेणबत्ती, माचिस, सुकाखाऊ (बिस्किट, फरसाण वगैरे), युज अँड थ्रो डिश, ताट, वाटी, लहान मुलांचे किट, ORS, चप्पल, डाळ, तांदूळ, मीठ, तेल, तिखट, गहू/तांदूळ पिठ, दूध पावडर, पिण्याच्या पाप्याच्या बाटल्या/बाटला व इतर गृहपयोगी वस्तू (भांडी) अशा  अत्यावश्यक वस्तू इत्यादी स्वीकारल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

साहित्य जमा करण्याचे ठिकाण

नगरसेवक संदीप दिलीप पटेल यांचे जनसंपर्क कार्यालय, सिद्धार्थनगर, गोरेगाव (प).

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content