Sunday, September 8, 2024
Homeडेली पल्सकोविड काळातले 'यात्रा'कडे...

कोविड काळातले ‘यात्रा’कडे थकलेले 23 कोटी ग्राहकांकडे परत

कोविडच्या काळात पर्यटनाला जाऊ न शकलेल्या ग्राहकांच्या विमान तिकिटांचे पैसे परत करण्याकरीता केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या रेट्यानंतर यात्रा, या ऑनलाईन मंचाकडून त्यांच्या ग्राहकांचे थकवण्यात आलेले तब्बल 26 कोटी परत केले.

कोविडमुळे पर्यटक पर्यटनासाठी बाहेर पडू शकले नाहीत. परिणामी त्यांनी यात्रा, या ऑनलाईन मंचामार्फत बूक केलेल्या विमान तिकिटांचे पैसे परत मागितले. पण, विमान कंपनी आम्हाला पैसे परत करत नसल्याचे कारण देत या कंपनीने पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू ठेवली. त्यानंतर अनेक ग्राहकांनी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांकावरून (1915-टोल फ्री क्रमांक) केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रारी नोंदविल्या. कोविड-19च्या लॉकडाऊनच्या काळात रद्द केलेल्या विमान तिकिटांच्या रकमेचा परतावा अद्याप न मिळाल्याच्या अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या. विमान कंपन्यांनी परतफेड न केल्याने ही रक्कम देऊ शकत नसल्याचे कारण अनेक पर्यटन कंपन्यांनी दिल्याचे ग्राहकांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते.

याचा पाठपुरावा सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने प्रवासी लीगल सेल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया (W.P.(C)D.No.10966 of 2020)मध्ये 01.10.2020 रोजी दिलेल्या निर्णयात असे म्हटले की, “जर कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात पर्यटन संस्थेमार्फत प्रवासासाठी तिकिटांचे आरक्षण केले असेल, तर अशा सर्व प्रकरणांमध्ये विमान कंपन्यांनी ताबडतोब पूर्ण रकमेची परतफेड करावी. अशी परतफेड झाल्यानंतर एजंटद्वारे प्रवाशांना ही रक्कम ताबडतोब पाठवली जावी.”

यात्रा

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कोविड-19 लॉकडाऊनमुळे रद्द कराव्या लागलेल्या विमान तिकिटांच्या रकमेची परतफेड करण्यासाठी यात्रा, या ऑनलाईन पर्यटन मंचावर कारवाई केली. या पर्यटन कंपनीला 9 मार्च 2021 रोजी कोविड-19मुळे प्रभावित आरक्षणाच्या परताव्याबाबत झालेल्या विलंबाबद्दल कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. नंतर याचा पाठपुरावा करण्याकरीता अनेक सुनावण्या घेतल्या.यात्रा ऑनलाईन लिमिटेडचे वर्ष 2021मध्ये, 36,276 तिकीट आरक्षणांचे  26 कोटी25 लाख 82,484 रुपयांचे परतावे प्रलंबित होते. प्राधिकरणाच्या पाठपुराव्यानंतर कंपनीकडून 31439 ग्राहकांचे तब्बल 23 कोटी 72 लाख 95386 रूपये परत करण्यात आले. 21 जून 2024पर्यंत ही रक्कम अदा करण्यात आली. परत केली गेलेल्या रकमेची टक्केवारी 87 टक्के आहे. आता 4,837 आरक्षणासाठी 2 कोटी 52 लाख 87,098 रूपयांचे परतावे प्रलंबित आहेत. ते परत करण्यासाठीही प्राधिकरण पाठपुरावा करत आहे.

वर्ष 2021मध्ये, विमान कंपन्यांशी संबंधित एकूण 5,771 आरक्षणांसाठी  9,60,14,463 रुपयांचे परतावे प्रलंबित होते. वर्ष 2024पर्यंत यात घट होऊन  यात्रा कंपनीने ही संख्या विमान कंपन्यांशी संबंधित 98 आरक्षणांपोटी 31,79,069 रुपयांवर आणली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने 27 जून 2024च्या आदेशाद्वारे यात्रा कंपनीशी निगडित उर्वरित 22 विमान कंपन्यांना ग्राहकांना 31,79,069 रुपयांची रक्कम त्वरित परत करण्याचे निर्देश दिले आहेत.

यात्रा

प्राधिकरणासमोर झालेल्या सुनावणीत मेक माय ट्रिप, इझ माय ट्रिप, क्लिअर ट्रिप, इक्सिगो आणि थॉमस कूक यासारख्या इतर अनेक प्रवासी मंचांनी, कोविड-19 लॉकडाउनमुळे ज्या ग्राहकांची तिकिटे प्रभावित झाली त्या ग्राहकांना संपूर्ण रक्कम परत केली.

ग्राहकांना वेळेवर आणि सुलभरित्या परतावा मिळावा यासाठी प्राधिकरणाने 27 जून 2024 रोजी आदेश जारी केला आहे. त्यानुसार यात्रा कंपनीला राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन इथे समर्पित व्यवस्था उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोविड-19 लॉकडाउनशी संबंधित कारणांमुळे रद्द झालेल्या विमानांसाठी त्यांची प्रलंबित परताव्याची रक्कम दिली जाईल, ही माहिती उर्वरित 4,837 ग्राहकांना कळवण्यासाठी त्यांना फोन करण्याकरिता राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन येथे पाच विशेष जागांची तरतूद करणे यात्रा कंपनीसाठी आवश्यक आहे. या कामासाठी समर्पित या पाच कर्मचाऱ्यांचा पूर्ण खर्च यात्रा कंपनीने करणे आवश्यक असून हेल्पलाईनचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेकडे थेट भरणा करणे आवश्यक आहे.

Continue reading

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राची बाजी!

गेले दोन वर्षं सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025, या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचे...

उद्यापासून श्री गणेशोत्सव!

उद्यापासून गणेशोत्सव! गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या वातावरणामुळे भाविकांमध्ये आंनद आणि उत्साह संचारतो. श्री गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या...

अनुराधा पौडवाल यांची नवी भक्तीमय स्वरभेट अर्पण!

गणेशोत्सवाचे औचित्य साधून आदि शंकराचार्य रचित ‘गणेश पंचरत्न’ या गणपतीच्या श्लोककाव्याची स्वरभेट लोकप्रिय ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मुंबईतील श्री सिध्दीविनायक मंदिरात मंगळवारी सकाळी श्रींच्या चरणी अर्पण केली. श्री सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर,...
error: Content is protected !!
Skip to content