Tuesday, September 17, 2024
Homeपब्लिक फिगरमुख्यमंत्र्यांचे उद्यापासून माझी...

मुख्यमंत्र्यांचे उद्यापासून माझी लाडकी बहिण कुटूंब भेट अभियान

शासनाच्या १० महत्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, १० सप्टेंबरपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटूंब भेट अभियानाला सुरुवात करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ कुटुंबांची भेट घेऊन अभियानाचा शुभारंभ करणार आहेत.

आज वर्षा निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी या अभियानाची माहिती दिली. या अभियानात शिवसैनिक दररोज १५ कुटुंबाची भेट घेतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा ज्यांना लाभ झालाय त्या कुटुंबांना आणि ज्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचली नाही, अशा कुटुंबांचीदेखील भेट घेऊन त्यांना योजनेत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातील. उद्या मुख्यमंत्री लाडकी बहिण कुटूंब भेट अभियानाचे ॲप लाँच होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री कृषीपंप वीज बिल माफ योजना, कामगार कल्याण योजना, महिला बचत गटासाठी विविध योजना अशा टॉप १० योजनांबाबत कुटुंबांना माहिती देणे, योजनांचा लाभ मिळाला की नाही याबाबत विचारपूस करणे, लाभ मिळाला नसेल तर तो मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करणे, शासनाच्या इतर योजनांची प्रक्रिया कुटुंबियांना समजावून सांगणे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटूंब भेट अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे कुटुंबातील एखादा वंचित असल्यास त्याची नोंद घेऊन या अभियानामुळे त्याला लाभ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला.

या कुटूंब भेटीत काही मागायला नाही तर जनतेला देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या धोरणांनुसार ही मोहीम राबवली जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीला ३० सप्टेंबर २०२४पर्यंत मुदवाढ दिली आहे. या योजनेचे अनेकांनी चांगले अनुभव सांगितले. बहिणींना खऱ्या अर्थाने मदतीचा हात देणारी ही योजना आहे. आतापर्यंत सुमारे २ कोटी महिलांनी या योजनेत अर्ज केले. त्यापैकी १ कोटी ६९ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आतापर्यंतच्या इतिहासात संपूर्ण कुंटुंबासाठी कल्याणकारी योजना आल्या नव्हत्या. अर्थव्यवस्थेला चालना देणारी सर्वात मोठी शक्ती महिला आहे. घराचे बजेट चालवणारी महिला असून तिच्या हाती येणारे पैसे पुन्हा अर्थव्यवस्थेत येणार आहेत. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत झाली तर त्याचा देशाला फायदा होईल. महाराष्ट्र आज उद्योग, इन्फ्रा, कृषी, गुंतवणूक या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे.

यापूर्वी शासन आपल्या दारी, या योजनेत राज्यातील ५ कोटींहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला. सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरुन पाच लाख रुपये इतकी वाढवली. हे सरकार शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, वारकरी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच घटकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

आतिशी सिंग दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज आपल्या पदाचा राजीनामा देत असून दुपारी १२ वाजता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. जेमतेम चार महिन्यांकरीता असणाऱ्या मुख्यमंत्रीपदी कैलाश गहलोत यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. त्यांची निवड झाल्यास हरयाणा विधानसभा निवडणुका...

पंतप्रधान नरेंद्र मोदी @ 74!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 74वा वाढदिवस साजरा करत असून आजच त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील सरकारला शंभर दिवस पूर्ण होत आहेl. यानिमित्त आज पंतप्रधान मोदी ओरिसामध्ये घरांच्या एका भव्य योजनेचे भूमिपूजन करणार आहेत. देशभरात भारतीय जनता पार्टीकडून आज पंतप्रधान मोदी यांचा...

उद्यापासून हिंदूंचा पितृपक्ष सुरू

हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यापैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक असते. माता-पिता तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यासाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ यावर्षी...
error: Content is protected !!
Skip to content