Homeचिट चॅटनवी मुंबईत 'स्वच्छ...

नवी मुंबईत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’!

सणासुदीचा हंगाम जवळ आला असताना, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या (MoHUA) नेतृत्त्वाअंतर्गत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ ही देशव्यापी मोहीम विशेष प्रकाशात येत आहे, जी नागरिकांना स्वच्छ आणि हरित पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करत आहे.

नवी मुंबईकर या चळवळीला मनापासून स्वीकारत असून नवी मुंबईत शॉपिंग मॉल्समधून सुरू केलेल्या सेल्फी मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आहेत. हा अनोखा उपक्रम ग्राहकांना मॉल्समध्ये जाण्यासाठी आकर्षित करत आहे.

दुसऱ्या स्वच्छ भारत मिशन-शहर अभियान (2.0) अंतर्गत ‘स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी’ मोहिमेचा एक भाग असलेल्या स्वच्छ दिवाळी स्वाक्षरी मोहिमेसाठी खरेदीदारांना स्वाक्षरी मोहीमेत (साइन अप) सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानंतर ते मॉलमधील सेल्फी पॉइंट्सवरून स्वच्छ दिवाळी सेल्फीद्वारे आपली पर्यावरणाबाबत जागरूकता आणि स्वच्छता यासह दिवाळी साजरी करण्याची आपली वचनबद्धता प्रदर्शित करु शकतात. नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ दिवाळी स्वाक्षरी मोहिमेसाठी साइन अप केलेल्या नागरिकांना खरेदीसाठी सवलतीच्या दरातील भेटकूपन ही दिली जात आहेत, ज्यामुळे निवड करणाऱ्यांमधे सकारात्मक मनोभावना निर्माण होत आहे. हा एक अनोखा उपक्रम असून त्यात नागरिकांचा समावेश असून स्वच्छतेच्या वचनबद्धतेसह उत्सवाचे प्रतिबिंब त्यातून दिसून येत आहे.

ही मोहीम केवळ नागरिकांना जनआंदोलनात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत नाही तर स्वच्छ दिवाळीसाठी त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व म्हणूनही काम करत आहे. या प्रयत्नात नवी मुंबईकर एकत्र आल्याने, स्वच्छ दिवाळी ‘शुभ दिवाळी’ ही केवळ मोहीम बनली नाही तर ती हरीत, स्वच्छ आणि अधिक शाश्वत पध्दतीने सणासुदीचे दिवस साजरे करण्याच्या सामूहिक चळवळीत बदलले आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content