Homeकल्चर +'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या ‘दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५’चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या एकांकिकेने कथानक, अभिनय आणि दिग्दर्शन या सर्वच स्तरांवर उत्कृष्टतेचा ठसा उमटवत सांघिक प्रथम क्रमांक पटकावत मानाचा फिरता करंडक पटकावला.

स्पर्धेचे यंदा आठवे वर्ष होते. महाराष्ट्रातील मुंबई, अहिल्यानगर, नागपूर, नाशिक, धुळे आणि पुणे अशा सहा केंद्रांवर स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात आली. अंतिम फेरी 10 आणि 11 ऑक्टोबरला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पद्मावती येथे घेण्यात आली. अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून मराठी नाट्यसृष्टीतील तीन दिग्गज मान्यवर प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले, प्रतिभाशाली लेखिका व अभिनेत्री मुग्धा गोडबोले-रानडे आणि जाणकार लेखक, दिग्दर्शक व अभिनेते योगेश शिरसाट यांनी परीक्षण समितीची धुरा सांभाळली. प्राथमिक फेरीचे परीक्षण नितीन धंदुके आणि श्रीकांत भिडे यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभास पी. एन. जी. ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ आणि कार्यकारी संचालक पराग गाडगीळ तसेच दिग्दर्शक व मुख्य संयोजक अजय नाईक यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते विजेत्या कलावंतांचा यथोचित गौरव करण्यात आला. या स्पर्धेने मराठी रंगभूमीला नवी आणि गुणवान प्रतिभा दिली असून, कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे असे मत सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केले.

या स्पर्धेत कलादर्शन व नाट्यशृंगार, पुणे यांच्या ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या एकांकिकेला प्रथम क्रमांकासह रोख रु. १,००,०००/- (एक लाख रुपये) आणि मानाचा फिरता दाजीकाका गाडगीळ करंडक प्रदान करण्यात आला. न्यू आर्ट्स कॉमर्स एंड सायन्स,अहिल्यानगर यांच्या ‘काही प्रॉब्लेम ये का?’ या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावत रु. ७५,०००/- चे बक्षीस जिंकले, तर रंगपंढरी, पुणे या संस्थेच्या ‘बरड’ या एकांकिकेला तृतीय क्रमांकासाठी रु. ५१,०००/- प्रदान करण्यात आले. याव्यतिरिक्त थिएटर मॅजिक यांच्या ‘तू ना जाने आसपास है खुदा’ आणि कलांश थिएटर यांच्या ‘मढं निघालं अनुदानाला’ या दोन एकांकिकांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून प्रत्येकी रु. १०,०००/- देऊन सन्मानित करण्यात आले.

Continue reading

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....

17 मार्चला मुंबईत टपाल पेन्शन अदालत

मुंबईच्या मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांनी टपाल विभागातल्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटूंब वेतनधारकांसाठी येत्या 17 मार्चला सकाळी साडेअकरा वाजता टपाल पेन्शन अदालतीचे आयोजन केले आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र परिमंडळ यांच्या कार्यालयात ही पेन्शन अदालत घेतली जाईल. महाराष्ट्र आणि...

तत्काळ पासपोर्टसाठी पुण्यात 7 तारखेला विशेष मोहीम

पुण्यातल्या प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने तत्काळ श्रेणीतल्या अर्जदारांसाठी पुण्याच्या पासपोर्ट सेवा केंद्रात येत्या शनिवारी, 7 फेब्रुवारीला विशेष पासपोर्ट मोहिमेचे आयोजन केले आहे. पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट लवकर मिळवून देण्यासाठी आणि तातडीच्या प्रवासाची गरज असलेल्या नागरिकांना पासपोर्ट सेवा पुरवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने हा...
Skip to content