Homeचिट चॅटऑस्ट्रेलियातल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिन्मय ढवळे,...

ऑस्ट्रेलियातल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिन्मय ढवळे, अजय कृष्णन जोडी विजेती 

ऑस्ट्रेलिया येथे क्वीन्स लँड बॅडमिंटन असोसिएशनने नुकत्याच ‌आयोजित केलेल्या एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी‌ बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडी चिन्मय ढवळे,अजय कृष्णन यांनी बाजी मारली.

या स्पर्धा ओपन ए, बी, सी व डी ग्रुपमध्ये घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत भारतीय जोडी चिन्मय ढवळे, मुंबई व अजय कृष्णन, केरळ यांनी “बी” ग्रुपमध्ये दुहेरीचे विजेतेपद मिळवले. या गटात‌ 14 जोड्यांनी भाग घेतला होता.  एक गेम 31 पॉईंटचा होता. स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यातून प्रथम चार जोड्यांनी उपांत्य फेरी गाठली.

चिन्मय व अजयने उपांत्य फेरीत पहिले मांनांकन देण्यात आलेल्या लुकान लान व दवे नऊंग जोडीचा सनसनाटी पराभव केला. त्यांनी अंतिम फेरीमध्ये तिसऱ्या मानांकित सुमित पुरी, राजेश वर्गीस जोडीवर सहजरीत्या मात करून दुहेरीचे विजेतेपद पटकावले. चिन्मय ढवळे मुंबईचा असून त्याला सुरुवातीच्या काळात आयकर विभागाचे माजी निरीक्षक व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मिलिंद पूर्णपात्रे यांचे मार्गदर्शन लाभले होते. चिन्मयने गेल्या महिन्यातसुद्धा 35 वर्षांवरील दुहेरीच्या गटात जुड वर्णकुला यांच्या साथीने विजेतेपद मिळवले होते.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content