Homeचिट चॅटऑस्ट्रेलियातल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिन्मय ढवळे,...

ऑस्ट्रेलियातल्या बॅडमिंटन स्पर्धेत चिन्मय ढवळे, अजय कृष्णन जोडी विजेती 

ऑस्ट्रेलिया येथे क्वीन्स लँड बॅडमिंटन असोसिएशनने नुकत्याच ‌आयोजित केलेल्या एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी, महिला एकेरी व दुहेरी‌ बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडी चिन्मय ढवळे,अजय कृष्णन यांनी बाजी मारली.

या स्पर्धा ओपन ए, बी, सी व डी ग्रुपमध्ये घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत भारतीय जोडी चिन्मय ढवळे, मुंबई व अजय कृष्णन, केरळ यांनी “बी” ग्रुपमध्ये दुहेरीचे विजेतेपद मिळवले. या गटात‌ 14 जोड्यांनी भाग घेतला होता.  एक गेम 31 पॉईंटचा होता. स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यातून प्रथम चार जोड्यांनी उपांत्य फेरी गाठली.

चिन्मय व अजयने उपांत्य फेरीत पहिले मांनांकन देण्यात आलेल्या लुकान लान व दवे नऊंग जोडीचा सनसनाटी पराभव केला. त्यांनी अंतिम फेरीमध्ये तिसऱ्या मानांकित सुमित पुरी, राजेश वर्गीस जोडीवर सहजरीत्या मात करून दुहेरीचे विजेतेपद पटकावले. चिन्मय ढवळे मुंबईचा असून त्याला सुरुवातीच्या काळात आयकर विभागाचे माजी निरीक्षक व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू मिलिंद पूर्णपात्रे यांचे मार्गदर्शन लाभले होते. चिन्मयने गेल्या महिन्यातसुद्धा 35 वर्षांवरील दुहेरीच्या गटात जुड वर्णकुला यांच्या साथीने विजेतेपद मिळवले होते.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content