Homeकल्चर +मुख्यमंत्री फडणवीस यांनी...

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले ‘सुनबाई लय भारी’चे पोस्टर लाँच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “सुनबाई लय भारी” या चित्रपटाचं पोस्टर नुकतेच लाँच केले. महिला सबलीकरणावर आधारित गोवर्धन दोलताडे निर्मित व शिवाजी दोलताडे दिग्दर्शित हा नवा चित्रपट आहे. मार्च महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचं चित्रिकरण सुरू करण्यात येणार आहे.

सोनाई फिल्म क्रिएशनतर्फे “सुनबाई लय भारी” या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रपटाच्या पोस्टर लाँचवेळी चित्रपटाचे लेखक, निर्माते गोवर्धन दोलताडे, अभिनेते रोहन पाटील, आमदार तुकाराम बिडकर उपस्थित होते. चित्रपटाचे सहनिर्माते कार्तिक दोलताडे पाटील आहेत. महिला सक्षमीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. शिक्षण आणि आरोग्यसेवा यासारख्या काही क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाली असली तरी, भारतातील महिलांना अजूनही पूर्ण सक्षमीकरणात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सक्षमीकरण म्हणजे महिलांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली साधने देणे इतकेच नाही; तर त्यामध्ये त्यांना मागे ठेवणाऱ्या सामाजिक संरचनांना आव्हान देणे आणि बदलणेदेखील समाविष्ट आहे. महिला सबलीकरणासह महिलांवरील अत्याचार थांबवणे, कमी पाठबळ असूनसुदधा कौशल्याच्या जोरावर उत्तुंग भरारी मारणे, सर्वसामान्य महिलांनी उद्योग व्यवसायात भरारी कशी घ्यावी या आशयसूत्रावर “सुनबाई लय भारी” हा चित्रपट बेतला आहे.

“सुनबाई लय भारी” हा चित्रपट समाजातील अनेक महिलांचे प्रश्न सोडवून त्यांना सामाजिक दृष्टीने वरदान ठरणार आहे. चित्रपटात मोठ्या कलाकारांचा समावेश असणार आहे. मात्र सध्या कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content