Homeमुंबई स्पेशलचवदार तळे होणार...

चवदार तळे होणार सुवर्ण मंदिराप्रमाणे सुशोभित!

महाड येथील चवदार तळ्याचे अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर सुशोभिकरण केले जाईल आणि त्यासाठी ६५ कोटी रुपयांचा प्रकल्प उच्चाधिकार समितीपुढे पंधरा दिवसात ठेवला जाईल, असे मंत्री उदय सामन्त यांनी आज मुंबईत विधानसभेत जाहीर केले.

प्रश्नोत्तराच्या तासात महाड येथील चवदार तळ्याच्या सौंदर्यीकरण आणि जलशुद्धीकरणाचे काम प्रलंबित असल्याचा प्रश्न संजय गायकवाड, प्रशान्त ठाकूर, समीर कुणावार, मनीषा चौधरी आदी आमदारांनी विचारला होता. त्या प्रश्नावर उपप्रश्न विचारताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच आमदार नितीन राऊत यांनी सरकारला धारेवर धरले. नागपूरच्या दीक्षाभूमीच्या ठिकाणी वाहनतळ विस्तारित करण्याला प्राधान्य दिले जाते तितकेच चवदार तळ्याच्या कामाला द्यावे आणि दादरच्या इंदू मिल स्मारकाला द्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली.

त्यावर उत्तर देताना सामन्त म्हणाले की, विधानसभेत निवडून आलेले सर्व २८८ आमदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहेत. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांच्याशी संबंधित सर्व स्मारकांचे काम युद्धपातळीवर केले जाईल. त्यावर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी सांगितले की, हा प्रस्ताव उच्चाधिकार समितीपुढे जाणार आहे. पण अर्थसंकल्पात दोनशे कोटी रुपयांची तरतूद केल्यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल स्मारकाचे काम सुरू झालेले नाही.

सामन्त यांनी त्यांना उत्तर देत स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या सरकारांनीच बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर ताब्यात घेऊन त्याचे स्मारकात रूपांतर केले आहे. त्यामुळे बाबासाहेबांबद्दल सर्वच सदस्यांना आणि लोकांना आदरच असल्याने त्यांच्यासंदर्भातील विषयांवरून राजकारण केले जाऊ नये.

Continue reading

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम...

‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’ प्रकाशित

सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित 'अभिजात साहित्याचे अक्षरविश्व', या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच झाले. या पुस्तकात १५३२ ते २००१ या कालावधील जगभरातील साहित्यकृतींचा...

मुंबईत पालिकांच्या शाळेत गणित, इंग्रजीसाठी स्मार्ट तंत्रज्ञान

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्‍या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात...
Skip to content