Homeटॉप स्टोरीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त केंद्र...

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त केंद्र सरकारी कार्यालये अर्धा दिवस बंद!

22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेविषयी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली उत्साहाची भावना आणि त्या सोहळ्यात सहभागी होण्याच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने देशातील केंद्र सरकारच्या आस्थापना अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापना दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद राहतील.

अयोध्येत होत असलेल्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासोबतच त्याच वेळी भारतात आणि परदेशात विविध ठिकाणी विविध संघटना आणि समुदायांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

या संपूर्ण सोहळ्याच्या थेट प्रसारणाची व्यवस्था राष्ट्रीय प्रसारक दूरदर्शनने केली आहे, जे प्रसारण विविध खाजगी टीव्ही वाहिन्यांवरूनही थेट दाखवले जाणार आहे. अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रसारण मोठ्या पडद्यांवर पाहण्यासाठी भारतात आणि परदेशात सार्वजनिक ठिकाणी देखील व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

Continue reading

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...
Skip to content