Homeडेली पल्सजातीसह जनगणनेची अधिसूचना...

जातीसह जनगणनेची अधिसूचना येत्या 16 जूनला!

भारतातली जातींच्या गणनेसह होणारी जनगणना-2027 दोन टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातला एक टप्पा 1 मार्च 2027च्या पहिल्या दिवशी सकाळी 00:00 वाजता मान्य केला जाईल. लडाख तसेच जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील आणि हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमधील असमानकालिक हिमाच्छादित भागांसाठी संदर्भतारीख 1 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 00:00 वाजता असेल. जनगणना कायदा 1948च्या कलम 3च्या तरतुदीनुसार, जनगणना करण्याच्या आशयाची अधिसूचना अंदाजे 16 जून 2025 रोजी राजपत्रात प्रकाशित केली जाईल.

भारताची शेवटची जनगणना 2011मध्ये दोन टप्प्यात करण्यात आली होती. 1) पहिला टप्पा- घरांची यादी (एच एल ओ) (1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2010) आणि (2) दुसरा टप्पा- लोकसंख्येची गणना (पीई) (09 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2011) – पहिल्या मार्च 2011च्या पहिल्या दिवशी 00:00 वाजता या संदर्भ तारखेसह; जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील असमानकालिक हिमाच्छादित क्षेत्रे वगळता, ज्यासाठी ती 11 ते 30 सप्टेंबर 2010दरम्यान आयोजित करण्यात आली होती आणि त्याची संदर्भ तारीख ऑक्टोबर 2010च्या पहिल्या दिवशी 00:00 वाजता होती. याच धर्तीवर 2021ची जनगणनादेखील दोन टप्प्यात करण्याचा प्रस्ताव होता, ज्याप्रमाणे पहिला टप्पा एप्रिल-सप्टेंबर 2020मध्ये आणि दुसरा टप्पा फेब्रुवारी 2021मध्ये आयोजित केला जाणार होता. 2021मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण झाली होती आणि काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1 एप्रिल 2020पासून क्षेत्रीय काम सुरू करण्याचे नियोजन होते. पण देशभरात कोविड-19, या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने जनगणनेचे काम पुढे ढकलण्यात आले. ते आता जातगणनेबरोबरच पूर्ण केले जाणार आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content