Homeडेली पल्सजातीसह जनगणनेची अधिसूचना...

जातीसह जनगणनेची अधिसूचना येत्या 16 जूनला!

भारतातली जातींच्या गणनेसह होणारी जनगणना-2027 दोन टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातला एक टप्पा 1 मार्च 2027च्या पहिल्या दिवशी सकाळी 00:00 वाजता मान्य केला जाईल. लडाख तसेच जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील आणि हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमधील असमानकालिक हिमाच्छादित भागांसाठी संदर्भतारीख 1 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 00:00 वाजता असेल. जनगणना कायदा 1948च्या कलम 3च्या तरतुदीनुसार, जनगणना करण्याच्या आशयाची अधिसूचना अंदाजे 16 जून 2025 रोजी राजपत्रात प्रकाशित केली जाईल.

भारताची शेवटची जनगणना 2011मध्ये दोन टप्प्यात करण्यात आली होती. 1) पहिला टप्पा- घरांची यादी (एच एल ओ) (1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2010) आणि (2) दुसरा टप्पा- लोकसंख्येची गणना (पीई) (09 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2011) – पहिल्या मार्च 2011च्या पहिल्या दिवशी 00:00 वाजता या संदर्भ तारखेसह; जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील असमानकालिक हिमाच्छादित क्षेत्रे वगळता, ज्यासाठी ती 11 ते 30 सप्टेंबर 2010दरम्यान आयोजित करण्यात आली होती आणि त्याची संदर्भ तारीख ऑक्टोबर 2010च्या पहिल्या दिवशी 00:00 वाजता होती. याच धर्तीवर 2021ची जनगणनादेखील दोन टप्प्यात करण्याचा प्रस्ताव होता, ज्याप्रमाणे पहिला टप्पा एप्रिल-सप्टेंबर 2020मध्ये आणि दुसरा टप्पा फेब्रुवारी 2021मध्ये आयोजित केला जाणार होता. 2021मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची तयारी पूर्ण झाली होती आणि काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 1 एप्रिल 2020पासून क्षेत्रीय काम सुरू करण्याचे नियोजन होते. पण देशभरात कोविड-19, या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने जनगणनेचे काम पुढे ढकलण्यात आले. ते आता जातगणनेबरोबरच पूर्ण केले जाणार आहे.

Continue reading

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...

‘ब्रँड एकनाथ’ला मान्यता! मोदींनी दिले तब्बल 2 तास!!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, 7-लोककल्याण मार्ग या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या...
Skip to content