Monday, July 1, 2024
Homeहेल्थ इज वेल्थनैराश्यग्रस्त विद्यार्थ्यांसाठी लावा...

नैराश्यग्रस्त विद्यार्थ्यांसाठी लावा टोल फ्री नंबर 14416

सध्या इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षांचे निकाल लागले आहेत. या परीक्षांमध्ये कमी गुण मिळालेले अथवा अपयश आलेल्या विद्यार्थ्यांकडून टोकाचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करून त्यामधून बाहेर काढण्याकरीता राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची टेलिमानस – ‘मनोविकारावरील दूरध्वनीद्वारे सल्ला’ ही सेवा उपलब्ध आहे. टेलिमानस सेवेकरिता टोल फ्री क्रमांक 14416 (भ्रमणध्वनीसाठी) आणि 18008914416 (लँडलाईनसाठी) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तरी या सेवेचा गरजू विद्यार्थी, नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट, सायक्याट्रिक नर्स आणि सायक्याट्रिक सोशल वर्कर समुपदेशनाचे कार्य करीत असून या सेवेसाठी मनोविकृतीतज्ज्ञदेखील नियुक्त आहेत. राज्यात आजपर्यंत 70 हजार व्यक्तींनी अशा समुपदेशनाचा लाभ घेतला आहे. यामध्ये नैराश्य, ताणतणाव, निद्रानाश, दु:खी मन:स्थिती, पौगंडावस्थेतील मानसिक स्थित्यंतरे आदी समस्यांचे निराकारण केले जाते. राज्याच्या टेलिमानस कार्यक्रमाच्या उपयोगीतेमध्ये देशात दुसरा क्रमांक आहे. मोठ्या प्रमाणात गरजू नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत, असे आयुक्त, आरोग्य सेवा यांनी कळविले आहे.

Continue reading

लष्करप्रमुख मनोज पांडे सेवानिवृत्त

लष्करातील आपल्या चार दशकांहून अधिक काळच्या सेवेनंतर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे काल सेवानिवृत्त झाले. त्यांचा कार्यकाळ उच्चस्तरीय युद्धसज्जता, परिवर्तनाच्या प्रक्रियेला चालना देण्याबरोबरच आत्मनिर्भरता उपक्रमाचे बळकटीकरण करण्यासाठी स्मरणात राहील. लष्करप्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांनी उत्तर आणि पश्चिम सीमेवर सैन्य परिचालन तयारीला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांनी...

जनरल उपेंद्र द्विवेदी भारताचे नवे लष्करप्रमुख!

जनरल उपेंद्र द्विवेदी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम आता भारताचे नवे लष्करप्रमुख झाले. काल त्यांनी जनरल मनोज पांडे, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एडीसी यांच्याकडून 30वे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. जनरल मनोज पांडे काल 30 जून 2024 रोजी चार दशकांहून अधिक काळ देशसेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले. जनरल उपेंद्र द्विवेदी एक कुशल लष्करी अधिकारी असून त्यांनी सशस्त्र...

तंबाखूच्या जादा उत्पादनावरील दंड होणार माफ?

तंबाखू मंडळातील कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे तसेच शेतकऱ्यांनी यावर्षी उत्पादित केलेल्या अतिरिक्त तंबाखूवरील दंड माफ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दिले. शनिवारी गोयल यांनी हैदराबादमधील शमशाबाद येथील नोवोटेल येथे...
error: Content is protected !!