Homeमुंबई स्पेशलमुंबई महापालिका मुख्यालय...

मुंबई महापालिका मुख्यालय झाले ‘गुलाबी’!

सोमवारी सत्ताधाऱ्यांच्या ‘महाराष्ट्र बंद’ने त्रासल्यानंतर मुंबईकरांना छत्रपती शिवाजी टर्मिनसवर सुखद आनंद घेण्याची संधी मिळाली. तेथील महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत गुलाबी झाली होती. या गुलाबी प्रकाशात न्हाऊन निघालेल्या इमारतीच्या समोर उभे राहून कित्येक शौकिनांनी आपले फोटो काढून घेण्याची हौस फिटवली.

आंतरराष्ट्रीय बालिका दिवस (International Day of the Girl Child) निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची इमारत काल (दिनांक ११ ऑक्टोबर २०२१) गुलाबी रंगाच्या विद्युत झोतात उजळून निघाली.

सन २०११पासून दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील बालिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत जनजागृती व्हावी, तसेच बालिकांना त्यांचे अधिकार मिळावेत, या हेतूने दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर बालिका दिवस साजरा व्हावा, यासाठी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये कॅनडा, या देशाने नेतृत्त्व केले होते.

या पार्श्वभूमीवर, कॅनडाचे मुंबईतील राजदूत केथ कॅन यांनी पालिका प्रशासनाला पत्र लिहून, ११ ऑक्टोबर २०२१ रोजी पालिका मुख्यालयाची इमारत गुलाबी रंगाच्या विद्युत रोषणाईने उजळावी, अशी विनंती केली होती. या विनंतीचा मान राखत तसेच बालिकांच्या हक्क, अधिकारांविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने पालिकेने आपल्या मुख्यालयाची इमारत गुलाबी रंगातील विद्युत दिव्यांच्या रोषणाईने उजळून काढली.

यंदाच्या (२०२१) आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाचे घोषवाक्य ‘डिजीटल जनरेशन, अवर जनरेशन’ असे आहे. आधुनिक युगात, मुलांइतकाच मुलींनाही अद्ययावत तंत्रज्ञानाचा तसेच साधनांच्या वापराचा अधिकार मिळावा, हा या घोषवाक्यामागील जनजागृतीपर उद्देश आहे.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चापासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content