Homeचिट चॅटभारतरत्न सीएनआर राव...

भारतरत्न सीएनआर राव यांना ‘इनी’ पुरस्कार!

अक्षय ऊर्जा स्त्रोत आणि ऊर्जा साठा या क्षेत्रात केलेल्या संशोधन कार्याबद्दल भारतरत्न प्राध्यापक सी. एन. आर राव यांना ‘ऊर्जा फ्रंटीयर अवार्ड’ या नावाने परिचित असलेला आंतरराष्ट्रीय इनी पुरस्कार 2020 जाहीर करण्यात आला आहे. अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा हा पुरस्कार ऊर्जा संशोधन क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो.

प्रा. राव हायड्रोजन ऊर्जा, या मानवतेच्या कल्याणासाठी असलेल्या एकमेव उर्जा स्त्रोताच्या संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. हायड्रोजनचा साठा, हायड्रोजनचे फोटोकेमिकल आणि इलेक्ट्रोकेमिकल उत्पादन, हायड्रोजनचे सौर उत्पादन आणि अधातू उत्प्रेरक या सगळ्यावर त्यांनी संशोधन केले आहे.

रोमच्या क़्विरिनल पॅलेसमध्ये 14 ऑक्टोबर 2021 रोजी होणाऱ्या अधिकृत समारंभात त्यांना हा इनी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असेल.

ऊर्जा आणि पर्यावरण संशोधन क्षेत्रात, गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणून मान्यता मिळालेल्या या पुरस्काराचा उद्देश, ऊर्जा स्त्रोतांचा सुयोग्य वापर करण्यास प्रोत्साहन आणि नव्या पिढीला या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी पाठबळ तसेच प्रोत्साहन देणे आहे. इनीने वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेषाला दिलेले महत्त्व यातून अधोरेखित होते. रोख रक्कम आणि सुवर्णपदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

Continue reading

राज्यपाल आचार्य देवव्रत मुंबईत

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यासाठी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज, रविवारी मुंबईत सपत्नीक आगमन झाले. अहमदाबाद येथून तेजस एक्स्प्रेसने आलेल्या राज्यपालांचे तसेच त्यांच्या पत्नी दर्शनादेवी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल...

मुंबईत रिपब्लिकन पक्षाचा उपमहापौर!

येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद निश्चित मिळेल. रिपब्लिकन पक्षाला उत्तर मुंबई जिल्ह्यात किमान 7 जागा आणि संपूर्ण मुंबईत किमान 24 जागा महायुतीने सोडाव्यात असा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीकडे देण्यात यावा. त्यातील काही जागा रिपब्लिकन पक्ष...

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...
Skip to content