Homeचिट चॅटभारतरत्न सीएनआर राव...

भारतरत्न सीएनआर राव यांना ‘इनी’ पुरस्कार!

अक्षय ऊर्जा स्त्रोत आणि ऊर्जा साठा या क्षेत्रात केलेल्या संशोधन कार्याबद्दल भारतरत्न प्राध्यापक सी. एन. आर राव यांना ‘ऊर्जा फ्रंटीयर अवार्ड’ या नावाने परिचित असलेला आंतरराष्ट्रीय इनी पुरस्कार 2020 जाहीर करण्यात आला आहे. अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा हा पुरस्कार ऊर्जा संशोधन क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो.

प्रा. राव हायड्रोजन ऊर्जा, या मानवतेच्या कल्याणासाठी असलेल्या एकमेव उर्जा स्त्रोताच्या संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. हायड्रोजनचा साठा, हायड्रोजनचे फोटोकेमिकल आणि इलेक्ट्रोकेमिकल उत्पादन, हायड्रोजनचे सौर उत्पादन आणि अधातू उत्प्रेरक या सगळ्यावर त्यांनी संशोधन केले आहे.

रोमच्या क़्विरिनल पॅलेसमध्ये 14 ऑक्टोबर 2021 रोजी होणाऱ्या अधिकृत समारंभात त्यांना हा इनी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असेल.

ऊर्जा आणि पर्यावरण संशोधन क्षेत्रात, गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणून मान्यता मिळालेल्या या पुरस्काराचा उद्देश, ऊर्जा स्त्रोतांचा सुयोग्य वापर करण्यास प्रोत्साहन आणि नव्या पिढीला या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी पाठबळ तसेच प्रोत्साहन देणे आहे. इनीने वैज्ञानिक संशोधन आणि नवोन्मेषाला दिलेले महत्त्व यातून अधोरेखित होते. रोख रक्कम आणि सुवर्णपदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content