Homeहेल्थ इज वेल्थभांडूपचे सावित्रीबाई फुले...

भांडूपचे सावित्रीबाई फुले प्रसूतिगृह तात्पुरते बंद!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभागातील भांडूप परिसरात असणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतिगृहाच्या दुरूस्तीचे काम नुकतेच हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हे प्रसूतिगृह दुरूस्तीच्या कालावधीकरिता बंद ठेवण्यात येणार असल्याचे मुंबई महापालिकेने जाहीर केले आहे.

मात्र, या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी या प्रसूतिगृहाचे स्थलांतर हे भांडूप परिसरातच असणाऱ्या नजीकच्या “सुषमा स्वराज प्रसूतिगृह, लालबहादूर शास्त्री मार्ग, भांडूप” येथे करण्यात आले आहे. प्रसूतीगृहाच्या इमारतीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत सुषमा स्वराज प्रसूतीगृह येथूनच आवश्यक त्या वैद्यकीय सेवासुविधा पुरविण्यात येणार आहेत, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

‘एस’ विभागातील भांडूप (पश्चिम) येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतीगृहाची दुरूस्ती करण्याबाबतचा निर्णय पालिका प्रशासनामार्फत घेण्यात आला होता. त्यानुसार रूग्णांच्या सोयीसाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसूतीगृहातील वैद्यकीय सेवा जवळच्या सुषमा स्वराज प्रसूतीगृह, लाल बहादूर शास्त्री, भांडूप येथून नुकत्याच सुरू करण्यात आल्या आहेत, याची कृपया सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे आवाहन पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात द्वारे करण्यात आले आहे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content