Homeडेली पल्सशेतकऱ्यांच्या युरोप अभ्यासदौऱ्यासाठी...

शेतकऱ्यांच्या युरोप अभ्यासदौऱ्यासाठी भाई चव्हाण यांची निवड

राज्य कृषी विभागामार्फत आयोजित यंदाच्या शेतकरी परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी सिंधुदुर्गातील शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार गणपत उर्फ भाई चव्हाण यांची युरोप गट दौऱ्यासाठी निवड झाली आहे. १५ ते २८ फेब्रुवारी २०२६ असा हा एकूण १४ दिवसांचा अभ्यास दौरा आहे. या परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी ६ गटांमध्ये राज्यातील एकूण १८० शेतकऱ्यांची निवड झाली होती. यापैकी युरोप दौऱ्याकरीता राज्यातील ५५ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्पैयाकी ४१ शेतकऱ्यांनी स्वारस्य दाखविले. युरोप व्हिसा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या ४१ शेतकऱ्यांची अंतिम निवड झाली आहे.

या दौऱ्यामध्ये युरोप समुहातील फ्रान्स, स्विझर्लंड, जर्मनी आणि नेदरलँड्स या देशांतील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फलोत्पादन, दुग्धोत्पादन, बीज पक्रिया आदींशी संबंधित मान्यवर विद्यापीठांना भेटी देऊन माहिती घेण्यात येणार आहे. कृषी विभागाने या परदेशी दौऱ्यातील ज्ञानाचा उपयोग संबंधित शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील शेतकऱ्यांना करुन देण्याच्या उद्देशाने ६ परदेशी गटांमधून या दौऱ्याची आखणी केली आहे. या दौऱ्यामध्ये सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एकूण ५ शेतकऱ्यांची वेगवेगळ्या गटांतून निवड झाली आहे. यापैकी काही शेतकरी गट या अभ्यासदौऱ्यासाठी यापूर्वीच रवाना झाले आहेत.

युरोप अभ्यासदौऱ्यासाठी कोकणातील ८ शेतकरी

या युरोप दौऱ्यासाठी ठाणे येथील गुरुनाथ कांबळे, बबन हरणे, विष्णू म्हात्रे, पालघर येथील वैजनाथ पाटील, रायगड येथील सुरेंद्र विचारे, नुपूर भापकर, रत्नागिरी येथील मधुरा इनामदार आणि सिंधुदुर्गातील गणपत चव्हाण असे कोकणातील ८ शेतकरी रवाना होत आहेत.

Continue reading

अजितदादांच्या बारामतीसाठी पोटनिवडणूक जाहीर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या दोन्ही मतदारसंघांत 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4...

पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या ‘उपांत्य फेरी’चे बिगुल वाजले!

पश्चिम बंगालसह 5 राज्याxतील विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. त्यानुसार, केरळ, पुद्दुचेरी, आसाममध्ये एकाच टप्प्यात 9 एप्रिल रोजी, तर तामिळनाडूतही 23 एप्रिल रोजी एकाच...

यंदा मार्चपासूनच महाराष्ट्र उष्णतेच्या विळख्यात! पारा 7.6 अंशानी चढणार!!

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्य यंदाच्या मार्च महिन्यात उन्हाच्या असह्य झळांनी होरपळत आहे. मुंबई महानगर प्रदेशाने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यातच तीन उष्णतेच्या लाटांचा सामना केला असून, मार्चच्या पहिल्या भागात एकाचवेळी तीन उष्णतेच्या लाटा येणे ही मुंबईच्या इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटना आहे....
Skip to content