Homeडेली पल्सशेतकऱ्यांच्या युरोप अभ्यासदौऱ्यासाठी...

शेतकऱ्यांच्या युरोप अभ्यासदौऱ्यासाठी भाई चव्हाण यांची निवड

राज्य कृषी विभागामार्फत आयोजित यंदाच्या शेतकरी परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी सिंधुदुर्गातील शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार गणपत उर्फ भाई चव्हाण यांची युरोप गट दौऱ्यासाठी निवड झाली आहे. १५ ते २८ फेब्रुवारी २०२६ असा हा एकूण १४ दिवसांचा अभ्यास दौरा आहे. या परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी ६ गटांमध्ये राज्यातील एकूण १८० शेतकऱ्यांची निवड झाली होती. यापैकी युरोप दौऱ्याकरीता राज्यातील ५५ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्पैयाकी ४१ शेतकऱ्यांनी स्वारस्य दाखविले. युरोप व्हिसा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या ४१ शेतकऱ्यांची अंतिम निवड झाली आहे.

या दौऱ्यामध्ये युरोप समुहातील फ्रान्स, स्विझर्लंड, जर्मनी आणि नेदरलँड्स या देशांतील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फलोत्पादन, दुग्धोत्पादन, बीज पक्रिया आदींशी संबंधित मान्यवर विद्यापीठांना भेटी देऊन माहिती घेण्यात येणार आहे. कृषी विभागाने या परदेशी दौऱ्यातील ज्ञानाचा उपयोग संबंधित शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील शेतकऱ्यांना करुन देण्याच्या उद्देशाने ६ परदेशी गटांमधून या दौऱ्याची आखणी केली आहे. या दौऱ्यामध्ये सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एकूण ५ शेतकऱ्यांची वेगवेगळ्या गटांतून निवड झाली आहे. यापैकी काही शेतकरी गट या अभ्यासदौऱ्यासाठी यापूर्वीच रवाना झाले आहेत.

युरोप अभ्यासदौऱ्यासाठी कोकणातील ८ शेतकरी

या युरोप दौऱ्यासाठी ठाणे येथील गुरुनाथ कांबळे, बबन हरणे, विष्णू म्हात्रे, पालघर येथील वैजनाथ पाटील, रायगड येथील सुरेंद्र विचारे, नुपूर भापकर, रत्नागिरी येथील मधुरा इनामदार आणि सिंधुदुर्गातील गणपत चव्हाण असे कोकणातील ८ शेतकरी रवाना होत आहेत.

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content