Homeमुंबई स्पेशलमुंबईत उद्या फुकट...

मुंबईत उद्या फुकट मिळणार नाही लसीचा पहिला डोस!

कोविड-१९ विषाणू प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईतील सर्व शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रावर, शनिवारी, ४ सप्टेंबर २०२१ रोजी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे यादिवशी कोविड लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही. ज्यांना लसीचा पहिला डोस घ्यावयाचा आहे त्यांना खाजगी लसीकरण केंद्रांवर निर्धारित शुल्क देऊन घेता येईल.

मुंबईसह भारतात कोविड-१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी कोविड-१९ लस उपलब्ध झाली आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमांतर्गत १६ जानेवारी २०२१पासून मुंबई महापालिका क्षेत्रात लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. या लसीकरण कार्यक्रमामध्‍ये १ सप्टेंबर २०२१पर्यंत ६९ लाख २६ हजार २५५ लाभार्थ्‍यांना पहिली मात्रा (डोस) तर २५ लाख १७ हजार ६१३ लाभार्थ्‍यांना दुसरी मात्रा देण्‍यात आली आहे. या आकडेवारीवरुन असे निदर्शनास येते की, पहिल्या मात्रेच्या तुलनेत दुसरी मात्रा घेणाऱ्या लाभार्थ्‍यांचे प्रमाण कमी आहे.

ब्रेक द चेन, याअंतर्गत नव्‍याने सुधारीत तत्त्‍वे प्रसारीत करण्‍यात आलेली आहेत. त्यात सार्वजनिक निर्बंध शिथिल होऊन विविध आस्‍थापना सुरू झालेल्या आहेत. दोन्ही डोस घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांना उपनगरीय रेल्‍वे प्रवासाची मुभादेखील देण्‍यात आलेली आहे.

सद्यस्थितीत, कोविड-१९ या आजाराची रुग्‍णसंख्‍या काहीशी वाढत आहे. तसेच, कोविडची तिसरी लाट येण्‍याची शक्‍यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे.‍ या सर्व पार्श्वभूमीवर, कोविड-१९ लसीचा दुसरा डोस (कोविशिल्‍ड असल्यास पहिल्या डोसनंतर ८४ दिवस आणि कोव्‍हॅक्‍सिन असल्यास पहिल्या डोसनंतर २८ दिवस पूर्ण झाल्‍यास) घेऊन नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्‍यक आहे.

यामुळे अनुषंगाने, मुंबई महापालिकेने, मुंबईतील सर्व शासकीय व सार्वजनिक लसीकरण केंद्रावर, उद्या शनिवारी, ४ सप्टेंबर २०२१ रोजी कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र आयोजित केले आहे. म्हणजेच, उद्या दिवशी शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांवर कुणालाही पहिला डोस दिला जाणार नाही. त्यामुळे दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांनी या विशेष सत्राचा जास्‍तीतजास्‍त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Continue reading

निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज!

देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखून ठेवलेल्या जंगलाचाही विपर्यास होत आहे. झाडे, नद्या आणि निसर्ग वाचवण्यासाठी अनेक हातांची गरज आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी निसर्ग अभ्यासक श्रीरंग फडके लिखित 'रानसावल्या' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात व्यक्त केले. निसर्ग...

पंतप्रधान मोदींनी घेतला डोमगावच्या हुरड्याचा आस्वाद!

भारत व फ्रांसमधले संबंध एका वेगळ्या उंचीवर नेणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रांसचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे शिष्टमंडळ लोकभवनमध्ये उतरले होते. या दौऱ्यात लोकभवनातर्फे पंतप्रधानांच्या पाहुणचाराला अस्सल मराठी...

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...
Skip to content