Homeटॉप स्टोरीमदिरालये रात्री १०...

मदिरालये रात्री १० वाजेपर्यंत पण, देवालयांना टाळे!

राज्यातली उपहारगृहे, बार (मदिरालये) आणि मॉल तसेच सर्व प्रकारची दुकाने येत्या १५ ऑगस्टपासून आठवड्याच्या सर्व दिवशी रात्री १० वाजेपर्यंत चालू राहतील. मात्र, शाळा-महाविद्यालये, सिनेमा तसेच नाट्यगृहे आणि सर्व प्रकारची प्रार्थनास्थळे (देवालये) सध्यातरी बंदच राहतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज संध्याकाळी दिली.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. येत्या १५ ऑगस्टपासून हॉटेल व रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. तेथील सर्व कर्मचाऱ्यांचा लसीची दुसरा डोस होणे आवश्यक आहे. वेटर्स तसेच वेटिंगमधले ग्राहक यांनी तोंडाला मास्क लावलेला हवा. शॉपिंग मॉलही रात्री १० वाजेपर्यंत चालू राहतील. मात्र, त्यात लसींचे दोन डोस घेऊन १५ दिवस झालेल्यांनाच परवानगी असेल. १५ ऑगस्टपासूनच इनडोअर स्टेडिअम तसेच व्यायामशाळाही ५० टक्के क्षमतेने चालू राहतील, असे त्यांनी सांगितले.

लग्नाचे हॉलही १५ ऑगस्टपासून ५० टक्के क्षमतेने किंवा जास्तीतजास्त १०० जण तसेच खुल्या मैदानातले विवाह समारंभ ५० टक्के क्षमतेने किंवा जास्तीतजास्त २०० जणांच्या उपस्थितीत सुरू होऊ शकतील. प्रार्थनास्थळे, सिनेमागृह, नाट्यगृह मात्र सध्यातरी बंदच राहतील, असे टोपे यांनी सांगितले.

शाळा-महाविद्यालयांना टास्क फोर्सचा विरोध

लहान मुलांचे लसीकरण अद्याप झाले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांत पाठवण्यास कोविडविषयक टास्क फोर्सचा विरोध आहे. याच फोर्सच्या अधिकाऱ्यांची आज रात्री मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार आहे. त्यात याबाबतचा अंतीम निर्णय होईल, असेही ते म्हणाले.

तिसरी लाट येताच कडक लॉकडाऊन

सध्या आपण तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी करत आहोत. सध्या आपल्याकडे १३०० मेट्रिक टन इतका वैद्यकीय ऑक्सिजनचा साठा दरदिवसासाठी उपलब्ध आहे. तो २००० मेट्रिक टनापर्यंत वाढवता येईल. मात्र, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा साठा दुसऱ्या लाटेच्या उच्चतम पातळीच्या दीडपट असावा. त्याचाच अर्थ तो ३५०० मेट्रिक टनापर्यंत असणे गरजेचे आहे. केंद्र सरकारला इतर राज्यांनाही ऑक्सिजन द्यावा लागणार आहे. त्यामुळे इतका ऑक्सिजन उपलब्ध होईल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळेच आम्ही, ज्या दिवशी ७०० मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजन लागायला सुरूवात होईल तेव्हा राज्यभर कडक लॉकडाऊन जाहीर केला जाईल, असा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे, असे टोपे यांनी सांगितले.

Continue reading

काँग्रेसची मंत्रालयासमोरची जागा परस्पर आरबीआयच्या घशात!

काँग्रेससह विविध राजकीय पक्षांची नरीमन पाईंट भागातील कार्यालयांचे मेट्रोच्या कामासाठी सरकारच्या विनंतीवरून तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचजागी काँग्रेससह सर्व कार्यालये नव्याने बांधून देण्याचे आश्वासन मेट्रो कार्पोरेशनने दिले होते. पण आता मात्र काँग्रेस पक्षाला अंधारात...

लाभ घ्या आयुष्मान भारत आणि म. फुले जनआरोग्य योजनेचा

महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून राज्यातल्या सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्व लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड राज्यातल्या आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकानचालक यांच्यामार्फत तयार केले...

एमआयजी क्रिकेट क्लबची राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

मुंबईतल्या एमआयजी क्रिकेट क्लबच्या वतीने तिसरी महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धा येत्या 27 ते 29 सप्टेंबर 2025दरम्यान एमआयजी क्रिकेट क्लब, कलानगर वांद्रे (पाश्चिम), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन विभागात खेळविण्यात येणाऱ्या या...
Skip to content