Homeन्यूज अँड व्ह्यूजअवाडा एनर्जी महाराष्ट्रात...

अवाडा एनर्जी महाराष्ट्रात करणार ५० अब्जांची गुंतवणूक

शाश्वत ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी आणि सौर उर्जा सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून, अवाडा ग्रुपच्या अवाडा एनर्जी या अक्षय ऊर्जा विभागाला महाराष्ट्र शासनाच्या  एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड या उपकंपनीने ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ देऊन नुकतेच सन्मानित केले आहे. या प्रतिष्ठित मान्यतेमुळे अवाडा एनर्जीला २०२५पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात विकेंद्रित कृषी सौर पीव्ही प्रकल्पांच्या विकास आणि कार्यसंचालन करणे अनिवार्य आहे. याद्वारे एकूण १,१३८ मेगावॅट ऊर्जा उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०  किंवा ‘मिशन २०२५’चा एक भाग आहे. यानिमित्ताने अवाडा एनर्जी महाराष्ट्रात ५० अब्ज रूपयांची गुंतवणूक करणार आहे.

या योजनेचे महत्त्व अधोरेखित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण समृद्धी आणि शाश्वत ऊर्जा उपायांना पुढे नेण्यासाठी तिच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भाष्य केले. अवाडा ग्रुपचे अध्यक्ष विनीत मित्तल यांनीदेखील या उपक्रमाच्या सिंचनासाठी, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे मार्ग सुधारण्यासाठी स्थिर वीजपुरवठा करण्याच्या क्षमतेबद्दल आशावाद व्यक्त केला.

२०२५पर्यंत ३० टक्के कृषी फीडरचे सौरीकरण करण्याच्या उद्दिष्टासह महाराष्ट्राच्या कृषी उर्जेच्या लँडस्केपमध्ये क्रांती घडवून आणण्याचा एक महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या समारंभात याला अधिकृत मान्यता देत शेतकरी समुदायाचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि जागतिक स्तरावर राज्याची औद्योगिक स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी सरकारचे समर्पण अधोरेखित केले.

महाराष्ट्राचा अंदाजे २९ दशलक्ष इतका विशाल ग्राहक आधार आहे, ज्यापैकी ४.५ दशलक्ष राज्याच्या वीजेचा २२ टक्के वापर करणारे कृषी क्षेत्रात गुंतलेले आहेत. सिंचनासाठी विश्वसनीय दिवसा वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या आव्हानांना दीर्घकाळ तोंड द्यावे लागले आहे. कृषी सौर पीव्ही प्रकल्पांचे विकेंद्रीकरण करणे, १० जिल्ह्यांमधील १९२ ठिकाणी ५० अब्ज रुपयांची गुंतवणूक करून या समस्येवर एक धोरणात्मक उपाय हे कार्य पुढे सरकणार आहे. अखंडित दिवसभर उर्जा आणि सुमारे २ हजार ५०० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांची निर्मिती, ज्यामुळे स्थानिक आर्थिक विकासाला चालना मिळते.

Continue reading

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...

फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीबीआयचे ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’!

आंतरराष्ट्रीय पातळीवर फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच जगभरातील पोलीस दलांसोबत रिअल-टाइममध्ये समन्वय साधण्याकरीता सीबीआयने नुकतेच ‘ग्लोबल ऑपरेशन सेंटर’ स्थापन केले आहे. फरारी गुन्हेगारांचा मुद्दा केवळ देशाचे सार्वभौमत्व, आर्थिक स्थैर्य आणि कायदा आणि सुव्यवस्थेशीच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशीदेखील संबंधित आहे. परदेशात...

धनत्रयोदशीच्या दिवशी ‘अशुभ’ दक्षिणेलाच का लावतात दिवा?

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवाळीची सुरुवात दिवे प्रज्वलित करूनच केली जाते. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-परदेशात जिथे-जिथे दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो, तिथे-तिथे दीप पेटवूनच त्याची सुरुवात केली जाते. एरव्ही दक्षिण दिशेला दिवा पेटवणे अशुभ मानले जाते, परंतु धनत्रयोदशीला तो...
Skip to content