Homeचिट चॅटमहिला दिनानिमित्त झाला...

महिला दिनानिमित्त झाला अष्टनायिकांचा सन्मान

मुंबईतल्या विश्वभरारी फाउंडेशन-विलेपार्ले आणि नॅशनल लायब्ररी-वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल लायब्ररी वांद्रे येथे, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, “अष्टनायिका सन्मान सोहळा” एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिमाखात साजरा करण्यात आला.

यानिमित्ताने विविध क्षेत्रातील, आठ विदुषी या सोहोळ्यास आमंत्रित करण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुसंवादिनी मंगला खाडिलकर यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून निर्माती-दिग्दर्शिका कांचन अधिकारी आणि भूलतज्ज्ञ डॉ. अलका मांडके यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. या कार्यक्रमात रसिका धामणकर, विद्या प्रभू, सोनल खानविलकर, डॉ. श्वेता वर्पे, डॉ. सुचिता पाटील, डॉ. मृण्मयी भजक, अश्विनी देशपांडे, मीना गागरे या अष्टनायिकांना शाल व स्मृतिचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिपाली बोबडे यांनी दमदार आवाजात पोवाडा गाऊन, संपूर्ण सभागृहाला वीर रसात न्हाऊ घातले. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा लता गुठे यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाची संकल्पना अतिशय सुंदर शब्दात व्यक्त केली. नॅशनल‌ लायब्ररीच्या ग्रंथपाल धनश्री कुलकर्णी यांनी वाचनालयाच्या वतीने प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कांचन अधिकारी यांची मुलाखत डॉ. मृण्मयी भजक व प्रकाश राणे यांनी घेऊन, प्रेक्षकांना स्त्री सक्षमीकरण काय असू शकते याचे प्रबोधन केले. कांचन अधिकारी यांची मुलाखत चौफेर फटकेबाजी करणारी झाली. मंगला खाडिलकर यांची मुलाखत तेजेस्विनी मुंडये आणि प्रकाश राणे यांनी घेऊन त्यांच्याकडून अनेक मार्गदर्शनपर गोष्टी ऐकवित कार्यक्रमात बहार आणली. डॉ. अलका मांडके यांनी आपल्या छोटेखानी भाषणात प्रेक्षकांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी मुंडये आणि चारुलता काळे यांनी अतिशय समर्थपणे केले. अष्टनायिकांच्या वतीने सन्मानाला उत्तर देताना अश्विनी देशपांडे म्हणाल्या की, या सन्मानाने आम्ही साऱ्याजणी भारावून गेलो आहोत. कार्यक्रमाला आल्यावर आम्हा बायकांना माहेरी आल्यासारखे वाटले.

विश्वभरारी फाउंडेशनच्या अध्यक्षा लता गुठे आणि कार्यवाह प्रकाश राणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा कार्यक्रम दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अतिशय यशस्वीरित्या पूर्णत्वास नेला. चंद्रकांत बर्वे, प्रशांत राऊत, अशोक शिंदे, स्वाती पोळ तसेच नॅशनल लायब्ररीचे प्रमुख कार्यवाह प्रमोद महाडिक आणि इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. उपाध्यक्ष गुरुनाथ तेंडुलकर यांनी आभार मानले.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content