Homeकल्चर +अडीच दशकांनंतर अरुण...

अडीच दशकांनंतर अरुण कदम पुन्हा रंगभूमीवर!

हास्य अभिनेते आणि महाराष्ट्राची हास्यजत्राफेम कलाकार अरुण कदम जवळपास अडीच दशकानंतर पुन्हा रंगभूमीवर सक्रीय होत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून आनंदांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

भद्रकाली प्रॉड्कशन आणि प्रसाद कांबळी निर्मिती `वस्त्रहरण’ या नाटकातून ते पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आले असून या नाटकाचे पहिली तीन प्रयोग हाऊसफुल्ल झाल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्राची लोकधारा, या कार्यक्रमाने त्यांनी महाराष्ट्रातील रसिकांना आपली ओळख करून दिली.

त्यानंतर नटरंग या नाटकाने त्यांना सरी ग सरी, अशी बायको हवी, एकदा पाहवं करून, भटाच्या साक्षीने, पैसाच पैसा, भ्रमाचा भोपळा, बापाचा बाप, प्रतिक्रिया अशी नाटके मिळवून दिली.

काफिला हा त्यांचा हिंदी चित्रपटदेखील गाजला आहे. जुगाड, येरे येरे पैसा, लोणावळा बायपास, हृदयनाथ, घंटा, बाहुलीचे लगीन, धावाधाव, जनता जनार्दन अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे. हत्यार, चलो दिल्ली, थँक्स माँ अशा काही हिंदी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने ते घराघरात पोहोचले आहेत. देश-विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. आता ते पुन्हा एकदा रंगमंचावर रसिकांना हसवण्यासाठी येत आहेत. 

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content