Homeएनसर्कलअनुभव पुरस्कार योजनेसाठी...

अनुभव पुरस्कार योजनेसाठी करा 31 मार्चपर्यंत अर्ज!

अनुभव पुरस्कार योजना 2024 अंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31.3.2024 आहे. पोर्टलवर अनुभव वेळेवर सादर करण्यासाठी मंत्रालय / विभागांना निवृत्तीवेतनधारकांपर्यंत पोहोचण्याची विनंती करण्यात आली आहे. पुरस्कारविजेत्या नामांकनांच्या दस्तऐवजीकरणाच्या स्वरूपावर ज्ञान-सामायिकरण सत्रदेखील आयोजित केले गेले आहेत.

पंतप्रधानांच्या निर्देशानुसार, सरकारबरोबर काम करताना केंद्र सरकारच्या निवृत्त होत असलेल्या/निवृत्त कर्मचाऱ्यांचे अनुभव सामायिक करण्यासाठी मार्च 2015मध्ये ‘अनुभव पोर्टल’ नावाचे ऑनलाईन व्यासपीठ डी. ओ. पी. पी. डब्ल्यू. ने सुरू केले. निवृत्तीवेतनधारकांनी अनुभव व्यक्त करण्याची ही संस्कृती भविष्यात सुशासन आणि प्रशासकीय सुधारणांची पायाभरणी ठरेल, अशी संकल्पना आहे.

सरकारने, अनुभव पुरस्कार योजना 2024 अधिसूचित केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी, निवृत्त होणारे केंद्र सरकारचे कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारकांना, सेवानिवृत्तीच्या 8 महिने आधी आणि त्यांच्या निवृत्तीनंतर 1 वर्षापर्यंत, त्यांचे अनुभव लेखन सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर, संबंधित मंत्रालये/विभागांच्या मूल्यांकन केल्यानंतर लेख प्रकाशित केले जातील. प्रकाशित लेख, अनुभव पुरस्कार आणि परीक्षक प्रमाणपत्रांसाठी निवडले जातील.

‘अनुभव पुरस्कार विजेते स्पीक वेबिनार’ मालिकेअंतर्गत एका राष्ट्रीय मंचावर अनुभव पुरस्कार विजेते त्यांचे अनुभव सामायिक करतात.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content