Homeएनसर्कलअनुभव पुरस्कार योजनेसाठी...

अनुभव पुरस्कार योजनेसाठी करा 31 मार्चपर्यंत अर्ज!

अनुभव पुरस्कार योजना 2024 अंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31.3.2024 आहे. पोर्टलवर अनुभव वेळेवर सादर करण्यासाठी मंत्रालय / विभागांना निवृत्तीवेतनधारकांपर्यंत पोहोचण्याची विनंती करण्यात आली आहे. पुरस्कारविजेत्या नामांकनांच्या दस्तऐवजीकरणाच्या स्वरूपावर ज्ञान-सामायिकरण सत्रदेखील आयोजित केले गेले आहेत.

पंतप्रधानांच्या निर्देशानुसार, सरकारबरोबर काम करताना केंद्र सरकारच्या निवृत्त होत असलेल्या/निवृत्त कर्मचाऱ्यांचे अनुभव सामायिक करण्यासाठी मार्च 2015मध्ये ‘अनुभव पोर्टल’ नावाचे ऑनलाईन व्यासपीठ डी. ओ. पी. पी. डब्ल्यू. ने सुरू केले. निवृत्तीवेतनधारकांनी अनुभव व्यक्त करण्याची ही संस्कृती भविष्यात सुशासन आणि प्रशासकीय सुधारणांची पायाभरणी ठरेल, अशी संकल्पना आहे.

सरकारने, अनुभव पुरस्कार योजना 2024 अधिसूचित केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी, निवृत्त होणारे केंद्र सरकारचे कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारकांना, सेवानिवृत्तीच्या 8 महिने आधी आणि त्यांच्या निवृत्तीनंतर 1 वर्षापर्यंत, त्यांचे अनुभव लेखन सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर, संबंधित मंत्रालये/विभागांच्या मूल्यांकन केल्यानंतर लेख प्रकाशित केले जातील. प्रकाशित लेख, अनुभव पुरस्कार आणि परीक्षक प्रमाणपत्रांसाठी निवडले जातील.

‘अनुभव पुरस्कार विजेते स्पीक वेबिनार’ मालिकेअंतर्गत एका राष्ट्रीय मंचावर अनुभव पुरस्कार विजेते त्यांचे अनुभव सामायिक करतात.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content