Homeन्यूज ॲट अ ग्लांस10 लाख रुपयांपर्यंतचे...

10 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न होणार करमुक्त?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मोदी 3.0चा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2025-26 या वर्षासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून 10 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त होणार का? हा औत्सुक्याचा विषय आहे. आजच्या अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गीय, नोकरदारांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या अपेक्षांची पूर्तता मोदी सरकार करेल का, हे थोड्याच वेळात कळणार आहे.

यंदाचा अर्थसंकल्प आर्थिक शिस्त राखून आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करेल, अशी अटकळ बांधली जात आहे. करदाते, व्यावसायिक आणि उद्योग जगताला आशा आहे की, अर्थव्यवस्थेला गती देणारे काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. भांडवली खर्चाला प्रोत्साहन देतानाच रिअल इस्टेट, MSME, आरोग्यसेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), इलेक्ट्रिक वाहने (EVs) आणि अक्षय ऊर्जा यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांना अर्थसंकल्पातून बळ दिले जाण्याची आशा आहे.

या अर्थसंकल्पाकडून करसवलतीची एक मोठी अपेक्षा मध्यमवर्गीय, नोकरदार आणि छोट्या व्यावसायिकांना आहे. 10 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्याबरोबरच नवीन करप्रणाली अंतर्गत कर स्लॅबमध्ये सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा आहे. स्टँडर्ड डिडक्शन मर्यादेत वाढ करण्याचीही एक प्रमुख मागणी केली गेली आहे, जी सध्या जुन्या करप्रणाली अंतर्गत 50,000 रुपये आणि नवीन करप्रणाली अंतर्गत 75,000 रुपये आहे. अशा सुधारणांमुळे डिस्पोजेबल उत्पन्न आणि एकूण उपभोग वाढू शकतो, असा उद्योग क्षेत्रातील तज्ञांना विश्वास आहे.

Continue reading

बाजारात सहज ओळखू न येणारे बांगलादेशी नकली सोने विक्रीला!

सोन्याला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. लग्नसमारंभ असो, सण असो किंवा गुंतवणूक.. सोने खरेदी करणे हे भारतीयांचे, विशेषतः महाराष्ट्रीयांचे, अतूट परंपरेचे अंग आहे. मात्र, याच भावनिक आणि आर्थिक गुंतवणुकीचा फायदा घेत देशभरातील बाजारपेठांमध्ये बनावट सोन्याची विक्री वाढत असल्याचे धक्कादायक...

इराण युद्धामुळे भारतासमोर आव्हानेच आव्हाने!

इस्राईल व अमेरिकेने संयुक्त हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांना ठार मारल्यानंतर आता इराण अधिक आक्रमक झाला असून युद्धाची व्याप्ती वाढली आहे. या इराण युद्धामुळे भारतावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. सेक्टरनिहाय भारतावर होणारे परिणाम ऊर्जा व कच्चे...

इराण युद्धामुळे यंदा गंभीर खतटंचाईची शक्यता!

सध्याच्या इराण युद्धामुळे होर्मूझ सामुद्रधुनीमार्गे होणारी मालवाहतूक पूर्णतः प्रभावित झाली आहे. यामुळे केवळ इंधनच नव्हे तर जागतिक खतपुरवठाही यामुळे प्रभावित होणार आहे. यामुळे देशातील खरीप 2026 हंगामात खतटंचाईचे संकट गंभीर राहण्याची भीती व्यक्त होत आहे. इराण युद्धाने शेतकऱ्यांच्या खत पुरवठ्यात...
Skip to content