Homeचिट चॅटआंबेकर स्मृती शालेय-कॉलेज...

आंबेकर स्मृती शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धा १० डिसेंबरपासून

कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती आंतर शालेय-कॉलेज मोफत कॅरम स्पर्धा येत्या १० ते १२ डिसेंबरदरम्यान मुंबईच्या परळ येथील आरएमएमएस वातानुकूलीत सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे संस्थापक गं. द. आंबेकर यांच्या स्मृतीदिन-सप्ताहानिमित्त कामगारांच्या मुलामुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार सचिन अहिर यांच्या पुढाकाराने चॅम्पियन कॅरम बोर्डावर विनाशुल्क कॅरम स्पर्धा भरविण्यात येणार आहे. दोन्ही गटातील प्रत्येकी पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव मोहिते यांनी दिली.

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने होणारी ही स्पर्धा १६ वर्षांखालील शालेय गट तसेच १९ वर्षांखालील काॉलेज गट, अशा दोन गटात रंगणार आहे. नवोदित तसेच उदयोन्मुख ज्युनियर खेळाडूंना यावेळी तज्ज्ञ मंडळीकडून मोफत मार्गदर्शनही केले जाणार आहे. स्पर्धत सहभागी होणाऱ्या मुंबई बाहेरच्या डीएसओ जिल्हा पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. निवृत्ती देसाई, सुनील बोरकर, बजरंग चव्हाण आदी याकरीता विशेष प्रयत्नशील आहेत. स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी संयोजक लीलाधर चव्हाण किंवा क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक यांच्याशी ९००४७५४५०७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संबंधितांनी केले आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content