Homeकल्चर +मोहना कारखानीस यांच्या...

मोहना कारखानीस यांच्या साहित्यकृतींवर रंगला परिसंवाद

सिंगापूरस्थित मराठी साहित्यिका मोहना कारखानीस यांच्या ‘टेक ऑफ’ (कथासंग्रह), ‘चेहरे, कहाण्या आणि सिंगापूर’ (लेखसंग्रह)) आणि `चंद्रकळा’ (कवितासंग्रह) या पुस्तकांवर आधारित ‘पुस्तकावर बोलू काही’ हा परिसंवाद मुंबईतल्या कांदिवलीत मान्यवर साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीत नुकताच रंगला. त्यांचे साहित्य हे सहज हळूवार भावविश्वांचे प्रतिनिधीत्व करते आणि त्यातून समाजमनाला त्या आपल्या जाणीवांचा प्रत्यय देत असतात, असा सूर यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

परिसंवादात साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर देवेंद्र भुजबळ, गौरी कुलकर्णी, कोमसाप अध्यक्षा नमिता कीर, अशोक मुळे (डिंपल प्रकाशन), लता गुठे (भरारी प्रकाशन) यांनी भाग घेतला. यावेळी त्यांच्या ‘टेक ऑफ’ कथेचे अभिवाचन गौरी कुलकर्णी यांनी केले. यानंतरच्या सत्रात ‘गोवा आणि मराठी साहित्य’ या विषयावर प्रिया बापट यांनी आपले विचार व्यक्त केले. अखेरच्या सत्रात निमंत्रित कवयित्रींचे काव्यवाचन झाले. यात गौरी कुलकर्णी, हेमांगी नेरकर, प्रतिभा सराफ, संगीता अरबुने, लता गुठे, ज्योती कपिले, फरझाना इक्बाल, मेघना साने, कविता मोरवणकर यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे निवेदन अश्विनी भोईर यांनी केले.

मोहना कारखानीस यांची तिन्ही पुस्तके यापूर्वी सिंगापूर येथे साहित्यव्रती आशा बगे यांच्या हस्ते प्रकाशित झाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

भारतातल्या २ ते ५ टक्‍के व्‍यक्‍ती हायपरहायड्रोसिसने पीडित

भारतातील २ ते ५ टक्‍के व्‍यक्‍ती हायपरहायड्रोसिसने पीडित असण्‍याचा अंदाज आहे. असे असतानादेखील या स्थितीबाबत जागरूकतेचा अभाव आहे. परिणामत: अनेक व्‍यक्‍तींना या वैद्यकीय स्थितीबाबत माहित नाही आणि ते नकळतपणे आजार सहन करतात. वेळेवर उपचार न केल्‍यास या आजाराचा दैनंदिन...

दिल्लीकरांनी अनुभवले मणिपुरी थांग-ता आणि शिवकालीन युद्धतंत्राचे थरारक क्षण!

दिल्लीतील भारत मंडपम् येथे सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आयोजित करण्यात आलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद' महोत्सवात भारताच्या गौरवशाली प्राचीन युद्धपरंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शौर्याचा सजीव, थरारक आविष्कार पाहायला मिळाला. या महोत्सवाने उपस्थितांमध्ये...

रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का?’ अव्वल!

सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. ११ व १२ डिसेंबर रोजी मुंबईतल्या यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा...
Skip to content