Homeन्यूज ॲट अ ग्लांसअणुऊर्जा नियामक परिषदेच्या...

अणुऊर्जा नियामक परिषदेच्या अध्यक्षपदी ए. के. बालासुब्रमणयन कार्यरत

प्रसिद्ध शास्त्रज्ञ ए. के. बालासुब्रमणयन यांनी नववर्षाच्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषद (एईआरबी) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी डॉ. डी. के. शुक्ला यांच्याकडून पदभार स्वीकारला. एईआरबीमध्ये दाखल होण्यापूर्वी बालासुब्रमणयन यांनी प्रकल्प डिझाईन सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. ही समिती प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर – पीएचडब्ल्यूआर आधारित अणुऊर्जा प्रकल्पांसाठी कार्यरत आहे.

ए. के. बालासुब्रमण्यन एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ असून, ते अणु अभियांत्रिकीचे प्रशिक्षण घेतलेले यांत्रिकी शाखेचे अभियंता आहेत. इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे ते फेलो आहेत. अणुऊर्जा प्रकल्पांची रचना, विकास, सुरक्षा मूल्यांकन, बांधकाम व कार्यान्वयन या सर्व क्षेत्रांत त्यांना जवळपास 40 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी पीएचडब्ल्यूआर अणुभट्ट्यासांठी

व्यवस्थापन धोरण तयार केले आहे. त्यातली उपकरणे जसजशी जुनी होतात, त्यांची सुरक्षितता आणि कार्यक्षमता टिकवण्यासाठी आखलेली तपासणी, देखभाल आणि सुधारणा यांच्या व्यवस्थापनात, योजना विकासात त्यांना व्यापक अनुभव आहे.

पहिल्यांदाच तयार केलेल्या प्रणालींच्या नवोन्मेषी रचनांमध्ये, सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये आणि स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अणुभट्टी तंत्रज्ञानातले ते तज्ज्ञ मानले जातात. पीएचडब्ल्यूआरव्यतिरिक्त इतर अणुभट्ट्यांच्या (रिअॅक्टर) तंत्रज्ञानातलेही त्यांना चांगले ज्ञान आहे. पूर्वी ते न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल-भारतीय अणुऊर्जा महामंडळ)च्या संचालक (तांत्रिक) पदावर कार्यरत होते. अणुभट्टी तंत्रज्ञान व सुरक्षा यावर अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी भाग घेतला आहे.

Continue reading

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...
Skip to content