HomeArchiveस्टार प्रचारक!

स्टार प्रचारक!

Details
स्टार प्रचारक!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
निवडणुकीत स्टार प्रचारक महत्त्वाचे असतात. आपल्या पक्षासाठी मतांचे पीक घेण्याचे काम ते करतात. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या काळात काँग्रेसला स्टार प्रचारकांची गरज नव्हती. नेहरू स्वत: इतके लोकप्रिय होते की भारतीय जनता त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकण्यास तयार होती. नेहरूंनंतर अल्पकाळासाठी लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. ते अकाली गेले. त्यांच्यानंतर पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या इंदिरा गांधीदेखील आपल्या पित्याप्रमाणेच लोकप्रिय ठरल्या. त्या काँग्रेसच्या स्टार प्रचारक बनल्या. आणीबाणीनंतर जनता पक्ष स्थापन झाला. त्या पक्षात स्टार प्रचारकांची कमतरता नव्हती. मोरारजी देसाई, चंद्रशेखर, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, राजनारायण आदी अनेक नेते जनता पक्षाचे स्टार प्रचारक बनले. तथापि, दोनच वर्षांत जनता पक्षाचे सरकार कोसळले. 1980 साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून देशात काँग्रेस आणि भाजप हेच दोन राष्ट्रीय पक्ष म्हणून एकमेकांच्या विरोधात सदैव उभे ठाकले.

 

भाजपची स्थापना झाली तेव्हा अटलजी, अडवाणीजी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह तरूण प्रमोद महाजन स्टार प्रचारक म्हणून देशभर फिरत होते. आता अटलजी आणि प्रमोदजी हयात नाहीत. अडवाणीजी आणि मुरली मनोहर जोशी हे वयोवृद्ध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय पातळीवरील भाजपचे एकमेव स्टार प्रचारक आहेत, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तम वक्ते आहेत. तेच भाजपचे राज्यातील स्टार प्रचारक आहेत. पण त्यांच्याबरोबर सध्या प्रचारात फिरत असलेला दुसरा स्टार प्रचारक म्हणजे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले होय. आठवले यांच्या पक्षाचा एकदेखील उमेदवार रिंगणात नाही. स्वत: आठवले राज्यसभा सदस्य आहेत. पण शिवसेना-भाजप युतीला विजयी करण्यासाठी ते पायाला भोवरा लावून सर्वत्र फिरत आहेत.

त्यांची विनोदी चारोळ्या असलेली भाषणे लोकांना आवडत आहेत. आतापर्यंत फडणवीस यांनी 34 लोकसभा मतदारसंघात 70 सभा घेतल्या. त्यांपैकी 90 टक्के सभांमध्ये त्यांच्यासोबत रामदास आठवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले की, त्यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याव्यतिरिक्त रामदास आठवले मंचावर हमखास असतात. याचे कारण आठवले यांना मानणारा महाराष्ट्रात मोठा दलित वर्ग आहे. आठवले काँग्रेस सरकारमध्ये राज्यात समाजकल्याण मंत्री असताना त्यांच्या चेंबरबाहेर लोकांची प्रचंड गर्दी उसळलेली दिसत असे. कोणत्याही मंत्र्याच्या दालनाबाहेर तशी गर्दी आजपर्यंत मंत्रालयात कोणी पाहिलेली नाही. आठवले यांची ही लोकप्रियता हेवा वाटावी, अशीच होती. किंबहुना, ती आजही कायम आहे. आठवले सदैव लोकांमध्ये असतात. त्यांच्या सुख-दु:खांत सामील होतात. केवळ राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील कार्यकर्त्यांनादेखील पहिल्या नावाने ओळखतात. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या ठायी हा गुण होता. दादा सांगलीचे होते आणि आठवलेदेखील सांगलीचे आहेत. तेव्हा आचार्य अत्र्यांच्या भाषेत बोलायचे झाल्यास `सांगली! सांगलीची मुले चांगली’ असेच म्हणावे लागेल.

 

काँग्रेसमध्ये असताना आठवले यांनी प्रामाणिकपणे काँग्रेसचा प्रचार केला. शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर काँग्रेसने तो आठवलेंसाठीच सोडला. पण विखे परिवाराने आठवले यांच्याविरोधात काम केल्यामुळे हमखास विजयाची खात्री असलेल्या या मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची संगत सोडून आठवले आधी शिवसेनेबरोबर आणि नंतर भाजपबरोबर गेले. केंद्रात त्यांना राज्यमंत्रीपद देऊन भाजपने त्यांच्या श्रमांचे चीज केले. आज आठवले भाजपचे स्टार प्रचारक बनले आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोघांनाही आपल्यासह ते हवे असतात, ही आठवलेंच्या लोकप्रियतेची पावती आहे.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
निवडणुकीत स्टार प्रचारक महत्त्वाचे असतात. आपल्या पक्षासाठी मतांचे पीक घेण्याचे काम ते करतात. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या काळात काँग्रेसला स्टार प्रचारकांची गरज नव्हती. नेहरू स्वत: इतके लोकप्रिय होते की भारतीय जनता त्यांच्यावरून जीव ओवाळून टाकण्यास तयार होती. नेहरूंनंतर अल्पकाळासाठी लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. ते अकाली गेले. त्यांच्यानंतर पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या इंदिरा गांधीदेखील आपल्या पित्याप्रमाणेच लोकप्रिय ठरल्या. त्या काँग्रेसच्या स्टार प्रचारक बनल्या. आणीबाणीनंतर जनता पक्ष स्थापन झाला. त्या पक्षात स्टार प्रचारकांची कमतरता नव्हती. मोरारजी देसाई, चंद्रशेखर, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, राजनारायण आदी अनेक नेते जनता पक्षाचे स्टार प्रचारक बनले. तथापि, दोनच वर्षांत जनता पक्षाचे सरकार कोसळले. 1980 साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून देशात काँग्रेस आणि भाजप हेच दोन राष्ट्रीय पक्ष म्हणून एकमेकांच्या विरोधात सदैव उभे ठाकले.

 

भाजपची स्थापना झाली तेव्हा अटलजी, अडवाणीजी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह तरूण प्रमोद महाजन स्टार प्रचारक म्हणून देशभर फिरत होते. आता अटलजी आणि प्रमोदजी हयात नाहीत. अडवाणीजी आणि मुरली मनोहर जोशी हे वयोवृद्ध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय पातळीवरील भाजपचे एकमेव स्टार प्रचारक आहेत, असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तम वक्ते आहेत. तेच भाजपचे राज्यातील स्टार प्रचारक आहेत. पण त्यांच्याबरोबर सध्या प्रचारात फिरत असलेला दुसरा स्टार प्रचारक म्हणजे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले होय. आठवले यांच्या पक्षाचा एकदेखील उमेदवार रिंगणात नाही. स्वत: आठवले राज्यसभा सदस्य आहेत. पण शिवसेना-भाजप युतीला विजयी करण्यासाठी ते पायाला भोवरा लावून सर्वत्र फिरत आहेत.

त्यांची विनोदी चारोळ्या असलेली भाषणे लोकांना आवडत आहेत. आतापर्यंत फडणवीस यांनी 34 लोकसभा मतदारसंघात 70 सभा घेतल्या. त्यांपैकी 90 टक्के सभांमध्ये त्यांच्यासोबत रामदास आठवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले की, त्यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याव्यतिरिक्त रामदास आठवले मंचावर हमखास असतात. याचे कारण आठवले यांना मानणारा महाराष्ट्रात मोठा दलित वर्ग आहे. आठवले काँग्रेस सरकारमध्ये राज्यात समाजकल्याण मंत्री असताना त्यांच्या चेंबरबाहेर लोकांची प्रचंड गर्दी उसळलेली दिसत असे. कोणत्याही मंत्र्याच्या दालनाबाहेर तशी गर्दी आजपर्यंत मंत्रालयात कोणी पाहिलेली नाही. आठवले यांची ही लोकप्रियता हेवा वाटावी, अशीच होती. किंबहुना, ती आजही कायम आहे. आठवले सदैव लोकांमध्ये असतात. त्यांच्या सुख-दु:खांत सामील होतात. केवळ राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील कार्यकर्त्यांनादेखील पहिल्या नावाने ओळखतात. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या ठायी हा गुण होता. दादा सांगलीचे होते आणि आठवलेदेखील सांगलीचे आहेत. तेव्हा आचार्य अत्र्यांच्या भाषेत बोलायचे झाल्यास `सांगली! सांगलीची मुले चांगली’ असेच म्हणावे लागेल.

 

काँग्रेसमध्ये असताना आठवले यांनी प्रामाणिकपणे काँग्रेसचा प्रचार केला. शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर काँग्रेसने तो आठवलेंसाठीच सोडला. पण विखे परिवाराने आठवले यांच्याविरोधात काम केल्यामुळे हमखास विजयाची खात्री असलेल्या या मतदारसंघात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची संगत सोडून आठवले आधी शिवसेनेबरोबर आणि नंतर भाजपबरोबर गेले. केंद्रात त्यांना राज्यमंत्रीपद देऊन भाजपने त्यांच्या श्रमांचे चीज केले. आज आठवले भाजपचे स्टार प्रचारक बनले आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोघांनाही आपल्यासह ते हवे असतात, ही आठवलेंच्या लोकप्रियतेची पावती आहे.”
 
 

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content