HomeArchiveवक्फ मंडळाला पूर्णवेळ...

वक्फ मंडळाला पूर्णवेळ सीईओ द्या, हाजी अरफात शेख यांची मागणी

Details
“वक्फ मंडळाला पूर्णवेळ सीईओ द्या, हाजी अरफात शेख यांची मागणी”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

राज्याच्या वक्फ मंडळात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असून याला चाप लावण्यासाठी वक्फ मंडळासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेमावा, अशी मागणी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी बुधवारी वक्फ खात्याचे मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली.

मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून आल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार केलेला अहवाल आणि तेथील समस्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी या विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक विभागाच्या विविध समस्या आणि वक्फ मंडळाबद्दल मुस्लिम समाजाच्या असलेल्या तक्रारी याचा पाढाच वाचला. यानंतर अल्फसंख्याक विभागाचे सह सचिव तसेच मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ संदेश तडवी यांना मंत्रीमहोदयांनी चांगलेच फैलावर घेतले. यापुढे वक्फ मंडळावर होणाऱ्या नेमणुका नियमित स्वरूपाच्या व्हाव्यात त्याचप्रमाणे जबाबदार लोकांनाच मंडळावर नियुक्त करावी जेणेकरून वक्फ जमिनींचा घोटाळा बाहेर निघू शकेल, असे ते म्हणाले.

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान समजलेल्या उर्दू घराच्या विषयावरदेखील चर्चा झाली. या चर्चेनंतर विनोद तावडे यांनी उर्दू घराचे काम लवकरात लवकर कसे होईल या संदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.”
 
“राज्याच्या वक्फ मंडळात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असून याला चाप लावण्यासाठी वक्फ मंडळासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेमावा, अशी मागणी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी बुधवारी वक्फ खात्याचे मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली.

मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून आल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार केलेला अहवाल आणि तेथील समस्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी या विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक विभागाच्या विविध समस्या आणि वक्फ मंडळाबद्दल मुस्लिम समाजाच्या असलेल्या तक्रारी याचा पाढाच वाचला. यानंतर अल्फसंख्याक विभागाचे सह सचिव तसेच मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ संदेश तडवी यांना मंत्रीमहोदयांनी चांगलेच फैलावर घेतले. यापुढे वक्फ मंडळावर होणाऱ्या नेमणुका नियमित स्वरूपाच्या व्हाव्यात त्याचप्रमाणे जबाबदार लोकांनाच मंडळावर नियुक्त करावी जेणेकरून वक्फ जमिनींचा घोटाळा बाहेर निघू शकेल, असे ते म्हणाले.

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान समजलेल्या उर्दू घराच्या विषयावरदेखील चर्चा झाली. या चर्चेनंतर विनोद तावडे यांनी उर्दू घराचे काम लवकरात लवकर कसे होईल या संदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.”

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content