HomeArchiveवक्फ मंडळाला पूर्णवेळ...

वक्फ मंडळाला पूर्णवेळ सीईओ द्या, हाजी अरफात शेख यांची मागणी

Details
“वक्फ मंडळाला पूर्णवेळ सीईओ द्या, हाजी अरफात शेख यांची मागणी”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

राज्याच्या वक्फ मंडळात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असून याला चाप लावण्यासाठी वक्फ मंडळासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेमावा, अशी मागणी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी बुधवारी वक्फ खात्याचे मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली.

मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून आल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार केलेला अहवाल आणि तेथील समस्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी या विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक विभागाच्या विविध समस्या आणि वक्फ मंडळाबद्दल मुस्लिम समाजाच्या असलेल्या तक्रारी याचा पाढाच वाचला. यानंतर अल्फसंख्याक विभागाचे सह सचिव तसेच मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ संदेश तडवी यांना मंत्रीमहोदयांनी चांगलेच फैलावर घेतले. यापुढे वक्फ मंडळावर होणाऱ्या नेमणुका नियमित स्वरूपाच्या व्हाव्यात त्याचप्रमाणे जबाबदार लोकांनाच मंडळावर नियुक्त करावी जेणेकरून वक्फ जमिनींचा घोटाळा बाहेर निघू शकेल, असे ते म्हणाले.

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान समजलेल्या उर्दू घराच्या विषयावरदेखील चर्चा झाली. या चर्चेनंतर विनोद तावडे यांनी उर्दू घराचे काम लवकरात लवकर कसे होईल या संदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.”
 
“राज्याच्या वक्फ मंडळात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असून याला चाप लावण्यासाठी वक्फ मंडळासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नेमावा, अशी मागणी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी बुधवारी वक्फ खात्याचे मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली.

मागील आठवड्यात पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून आल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तयार केलेला अहवाल आणि तेथील समस्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी या विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर त्यांनी अल्पसंख्याक विभागाच्या विविध समस्या आणि वक्फ मंडळाबद्दल मुस्लिम समाजाच्या असलेल्या तक्रारी याचा पाढाच वाचला. यानंतर अल्फसंख्याक विभागाचे सह सचिव तसेच मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ संदेश तडवी यांना मंत्रीमहोदयांनी चांगलेच फैलावर घेतले. यापुढे वक्फ मंडळावर होणाऱ्या नेमणुका नियमित स्वरूपाच्या व्हाव्यात त्याचप्रमाणे जबाबदार लोकांनाच मंडळावर नियुक्त करावी जेणेकरून वक्फ जमिनींचा घोटाळा बाहेर निघू शकेल, असे ते म्हणाले.

सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान समजलेल्या उर्दू घराच्या विषयावरदेखील चर्चा झाली. या चर्चेनंतर विनोद तावडे यांनी उर्दू घराचे काम लवकरात लवकर कसे होईल या संदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.”

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content