HomeArchiveरविवारच्या बाईक रॅलीला...

रविवारच्या बाईक रॅलीला ईशान्य मुंबईत तरूणाईचा जोरदार प्रतिसाद!

Details
रविवारच्या बाईक रॅलीला ईशान्य मुंबईत तरूणाईचा जोरदार प्रतिसाद!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईत लोकसभा निवडणुकीचे मतदान २९ एप्रिलला होत असून मतदानापूर्वी प्रचाराचा शेवटचा रविवार महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत सार्थकी लावला. काल सुट्टीचा दिवस असल्याने तसेच येत्या शनिवारी सायंकाळी प्रचार थंडावणार असल्याने मतदारसंघातील सर्वच भागात जास्तीतजास्त संख्येने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्ते धडपडत होते. मतदानाला आता अवघा एक आठवडा शिल्लक असल्याने एकत्र प्रचाराऐवजी महायुतीने नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विविध गटागटांद्वारे प्रचारावर भर दिला आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीचा शेवटचा रविवार बाईक रॅली आणि पदयात्रांसह मतदारांच्या घरोघरी जात वैयक्तिक भेटीगाठींवरभर देत महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी ईशान्य मुंबईत सार्थकी लावला. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने सकाळपासूनच महायुतीचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदारसंघातील विविध भागात फिरून थेट मतदारांशी संवाद साधताना दिसत होते. काहींनी तर सकाळी सहा वाजल्यापासूनच मतदारसंघातील उद्याने, सार्वजनिक वाचनालये तसेच चहाच्या स्टॉल्स वगैरेंना भेटी देत नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. सुट्टी असल्याने महायुतीचे सर्व युवा व महिला कार्यकर्तेही उत्साहाने प्रचारात सहभागी झाले होते. रविवारी प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद वापरल्याने सकाळी प्रचाराचा जोर होता, तर दुपारी तो काही काळ थंडावला आणि पुन्हा चारनंतर प्रचाराने उसळी घेतली. पारंपरिक प्रचार पद्धतीसोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांनी हायटेक प्रचारावरही भर दिला होता. प्रचाराचे क्षणाक्षणाचे अपटेडस, छायाचित्रे, फेसबुक पेज, वॉट्सअॅप, आणि ट्वीटरसारख्या समाज माध्यमातून व्हायरल केले जात होते. कार्यकर्त्यांच्या या प्रचारनियोजनाला मतदारांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला पाहयला मिळाला.

 

बाईक रॅलीला प्रचंड प्रतिसाद

ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी रविवारी सायंकाळी महा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पंतनगर बेस्ट डेपोपासून मुलुंड बालराजेश्र्वर मंदिरापर्यंत निघालेल्या या महाबाईक रॅलीत युवावर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता. विशेषकरून महिला आणि महाविद्यालयीन तरूणींनीही बाईकवर स्वार होत महायुतीसाठी
मतदानाचे आवाहन केले. यावेळी भाजप, शिवसेना आणि रिपाईच्या झेंड्यांमुळे परिसर महायुतीमय झाला होता.

 
 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईत लोकसभा निवडणुकीचे मतदान २९ एप्रिलला होत असून मतदानापूर्वी प्रचाराचा शेवटचा रविवार महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत सार्थकी लावला. काल सुट्टीचा दिवस असल्याने तसेच येत्या शनिवारी सायंकाळी प्रचार थंडावणार असल्याने मतदारसंघातील सर्वच भागात जास्तीतजास्त संख्येने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्ते धडपडत होते. मतदानाला आता अवघा एक आठवडा शिल्लक असल्याने एकत्र प्रचाराऐवजी महायुतीने नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विविध गटागटांद्वारे प्रचारावर भर दिला आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीचा शेवटचा रविवार बाईक रॅली आणि पदयात्रांसह मतदारांच्या घरोघरी जात वैयक्तिक भेटीगाठींवरभर देत महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी ईशान्य मुंबईत सार्थकी लावला. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने सकाळपासूनच महायुतीचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदारसंघातील विविध भागात फिरून थेट मतदारांशी संवाद साधताना दिसत होते. काहींनी तर सकाळी सहा वाजल्यापासूनच मतदारसंघातील उद्याने, सार्वजनिक वाचनालये तसेच चहाच्या स्टॉल्स वगैरेंना भेटी देत नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. सुट्टी असल्याने महायुतीचे सर्व युवा व महिला कार्यकर्तेही उत्साहाने प्रचारात सहभागी झाले होते. रविवारी प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकद वापरल्याने सकाळी प्रचाराचा जोर होता, तर दुपारी तो काही काळ थंडावला आणि पुन्हा चारनंतर प्रचाराने उसळी घेतली. पारंपरिक प्रचार पद्धतीसोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांनी हायटेक प्रचारावरही भर दिला होता. प्रचाराचे क्षणाक्षणाचे अपटेडस, छायाचित्रे, फेसबुक पेज, वॉट्सअॅप, आणि ट्वीटरसारख्या समाज माध्यमातून व्हायरल केले जात होते. कार्यकर्त्यांच्या या प्रचारनियोजनाला मतदारांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला पाहयला मिळाला.

 

बाईक रॅलीला प्रचंड प्रतिसाद

ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी रविवारी सायंकाळी महा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पंतनगर बेस्ट डेपोपासून मुलुंड बालराजेश्र्वर मंदिरापर्यंत निघालेल्या या महाबाईक रॅलीत युवावर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाला होता. विशेषकरून महिला आणि महाविद्यालयीन तरूणींनीही बाईकवर स्वार होत महायुतीसाठी
मतदानाचे आवाहन केले. यावेळी भाजप, शिवसेना आणि रिपाईच्या झेंड्यांमुळे परिसर महायुतीमय झाला होता.

 
 ”
 
 
 
 

Continue reading

बाळासाहेबांच्या रस्त्यात तुडवण्याच्या विचाराची सावंतांनी करून दिली आठवण

जो पक्ष तुम्हाला उमेदवारी देऊन निवडून आणतो, त्या पक्षाशी एकनिष्ठ राहण्याऐवजी पक्षाशी गद्दारी करता? अरे अशी गद्दारी करणाऱ्याला रस्त्यात तुडवा, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचा हाही विचार लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अशी...

नामांकने पाठवा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी

राष्ट्रीय पातळीवर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि...

मुंबई-अहमदाबाद ‘वंदे भारत’ला आजपासून कायमस्वरूपी 20 बोगी

रेल्वेने मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ‘वंदे भारत एक्सप्रेस’च्या (गाडी क्रमांक 22961/22962) बोगींची संख्या 16वरून 20पर्यंत कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बोगी वाढविण्‍याचा हा बदल आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून अंमलात आणण्‍यात येईल. या गाडीच्या  वाढवण्यात आलेल्या या चार डब्यांमध्ये तीन 'एसी चेअर...
Skip to content