HomeArchiveअंधेरीच्या गोखले पुलाचे...

अंधेरीच्या गोखले पुलाचे काम अखेर पूर्ण!

Details
अंधेरीच्या गोखले पुलाचे काम अखेर पूर्ण!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईत 1960च्या सुमारास बांधलेला आणि रेल्वे ट्रॅकवरून जाणारा अंधेरी पश्चिम व पूर्वेला जोडणारा व थेट पश्चिम द्रूतगती महामार्गापर्यंत जाणारा दुवा म्हणजे अंधेरीचा गोखले पूल. रोज या पुलावरून सुमारे 2.50 ते 3 लाख वाहने ये-जा करतात. गेल्या वर्षी 2 जुलैला सकाळी 8च्या सुमारास पावसात या पुलाचा दक्षिणेकडचा पदपथाचा काही भाग पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवरच कोसळल्याने मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत बंदच होती. तसेच गोखले पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने आणि पुलाचा काही भाग वाहतुकीस खुला करण्यात आला होता. परिणामी हा पूल अरूंद झाल्याने गेले वर्षभर अंधेरीकरांना व वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. हा पूल कोसळल्यानंतर या पुलाची जबाबदारी महापालिकेची का रेल्वेची यावरून या दोघांमध्ये कलगीतुरा चांगलाच रंगला होता.

 

अंधेरीच्या गोखले पुलाचे काम अखेर पूर्ण झाल्याने गेल्या रविवार दि. 16च्या सकाळपासून हा पूल अखेरीस वाहतूकीस खुला करण्यात आला. या पुलाच्या कामास सुमारे 3.34 कोटी रूपये खर्च आला आहे. आयआयटी पवईने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले असून या पुलाचा दक्षिणेकडच्या पदपथाचा काही भाग कोसळल्याने येथील पुलाच्या दुरूस्तीचे काम गेल्या जुलैपासून सुरू करण्यात आले होते. पालिका व रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयातून या पुलाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले. अखेर हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने येथील काही प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली असा विश्वास पालिकेच्या के पश्चिम विभागाचे साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केला.

याप्रकरणी अंधेरी पश्चिम येथील भाजपा आमदार अमित साटम यांनी सांगितले की, सदर घटना घडल्यापासून ते या पुलाची यशस्वी व मजबूत दुरूस्ती होण्यासाठी पालिका, रेल्वे यांच्याशी पाठपुरावा करत होते. मुंबईतील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. पावसाळा तोंडावर आला असताना अखेरीस हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने अंधेरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईत 1960च्या सुमारास बांधलेला आणि रेल्वे ट्रॅकवरून जाणारा अंधेरी पश्चिम व पूर्वेला जोडणारा व थेट पश्चिम द्रूतगती महामार्गापर्यंत जाणारा दुवा म्हणजे अंधेरीचा गोखले पूल. रोज या पुलावरून सुमारे 2.50 ते 3 लाख वाहने ये-जा करतात. गेल्या वर्षी 2 जुलैला सकाळी 8च्या सुमारास पावसात या पुलाचा दक्षिणेकडचा पदपथाचा काही भाग पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवरच कोसळल्याने मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत बंदच होती. तसेच गोखले पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने आणि पुलाचा काही भाग वाहतुकीस खुला करण्यात आला होता. परिणामी हा पूल अरूंद झाल्याने गेले वर्षभर अंधेरीकरांना व वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. हा पूल कोसळल्यानंतर या पुलाची जबाबदारी महापालिकेची का रेल्वेची यावरून या दोघांमध्ये कलगीतुरा चांगलाच रंगला होता.

 

अंधेरीच्या गोखले पुलाचे काम अखेर पूर्ण झाल्याने गेल्या रविवार दि. 16च्या सकाळपासून हा पूल अखेरीस वाहतूकीस खुला करण्यात आला. या पुलाच्या कामास सुमारे 3.34 कोटी रूपये खर्च आला आहे. आयआयटी पवईने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले असून या पुलाचा दक्षिणेकडच्या पदपथाचा काही भाग कोसळल्याने येथील पुलाच्या दुरूस्तीचे काम गेल्या जुलैपासून सुरू करण्यात आले होते. पालिका व रेल्वे प्रशासन यांच्या समन्वयातून या पुलाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले. अखेर हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने येथील काही प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली असा विश्वास पालिकेच्या के पश्चिम विभागाचे साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केला.

याप्रकरणी अंधेरी पश्चिम येथील भाजपा आमदार अमित साटम यांनी सांगितले की, सदर घटना घडल्यापासून ते या पुलाची यशस्वी व मजबूत दुरूस्ती होण्यासाठी पालिका, रेल्वे यांच्याशी पाठपुरावा करत होते. मुंबईतील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. पावसाळा तोंडावर आला असताना अखेरीस हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने अंधेरीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.”
 

Continue reading

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...

दिवाळीत प्रियजनांना भेट द्या वर्षभराच्या ‘फ्री’ फास्टॅगची!

भारताच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला सुरू झालेल्या, फास्टॅग वार्षिक पासला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत पंचवीस लाख वापरकर्त्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सुरूवात झाल्यापासून दोन महिन्यांत त्यावर सुमारे 5.67 कोटी व्यवहारांची नोंद झाली आहे. फास्टॅग वार्षिक पासला मिळालेला प्रचंड प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग वापरकर्त्यांना तो सुरळीत...
Skip to content