HomeArchiveकांदिवलीच्या जनतानगर पादचारी...

कांदिवलीच्या जनतानगर पादचारी पुलाचे लोकार्पण!

Details
कांदिवलीच्या जनतानगर पादचारी पुलाचे लोकार्पण!

    29-Aug-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
Hegdekiran17@gmail.com
 
मुंबईतील कांदिवली पूर्व येथील जनतानगर परिसरातील पूल सुमारे तीन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसांत वाहून गेला होता त्यामुळे नागरिकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी वळसा घालून जावे लागायचे. पूर्वी असलेल्या जागीच पादचारी पूल व्हावा, यासाठी स्थानिक नागरिक आग्रही होते. त्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याची माहिती कांदिवलीतील भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.
 
 
पोयसर, जनतानगर पादचारी पुलाचा लोकार्पण सोहळा नुकताच आमदार भातखळकर यांच्या हस्ते झाला. या पादचारी पुलामुळे पोयसरवासीयांना दिलासा मिळणार आहे. पोयसर नदीवर बनलेला हा पादचारी पूल म्हणजे जनतानगर आणि कांदिवली रेल्वेस्थानकाला जोडणारा दुवा होता. दररोज शेकडो नागरिक कांदिवली रेल्वेस्थानकाला जाण्यासाठी याच पादचारी पुलाचा वापर करत. आमदार भातखळकर यांनी पुढाकार घेऊन पूलनिर्मितीचा विडा उचलला. या कामातही अनेक अडचणी आल्या. हा पादचारी पूल उभारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे एक सल्लागारही नेमण्यात आला होता. नवीन पादचारी पुलाचा आराखडाही सल्लागाराने सादर केला. मात्र आराखड्याप्रमाणे काम करायचे झाल्यास एकीकडे पोयसर नदी, तर दुसरीकडे पोयसरमधल्या आखूड गल्ल्या यामुळे जागेची कमतरता भेडसावत होती. तसेच पुलाच्या बांधकामासाठी लागणारे सामान इच्छित ठिकाणी नेण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नव्हता, असेही ते म्हणाले.
 
 

 
 
 
अखेर आमदार भातखळकरांनी सीओडी प्रशासनाशी याविषयी चर्चा केली आणि सामानाची ये-जा करण्यासाठी लागणाऱ्या गाड्यांना सीओडी परिसरातून मार्ग मिळवून द्यावा, अशी मागणी सीओडी प्रशासनाकडे केली. अखेर या मागणीस अनुकूल प्रतिसाद देत सीओडी परिसरातून गाड्यांची ये-जा करण्यासाठी परवानगी देण्यात आली. आज हा पादचारी पूल सर्वसामान्य जनतेसाठी खुला झाल्याने नागरिकांची सोय होणार आहे. या पुलामुळे आनंदित झालेल्या नागरिकांनी आमदार अतुल भातखळकरांचे आभार मानले. या लोकार्पण कार्यक्रमास नगरसेवक शिवकुमार झा आणि नगरसेविका सुनीता यादव, मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
 

 
 
 
 
 
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

पूरबाधित कुटुंबियांच्या घरी घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/29/Chandrakant-Patil-s-helping-to-the-potter-community.html
 ”
 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
Hegdekiran17@gmail.com
 
“मुंबईतील कांदिवली पूर्व येथील जनतानगर परिसरातील पूल सुमारे तीन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसांत वाहून गेला होता त्यामुळे नागरिकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी वळसा घालून जावे लागायचे. पूर्वी असलेल्या जागीच पादचारी पूल व्हावा, यासाठी स्थानिक नागरिक आग्रही होते. त्यासाठी संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याची माहिती कांदिवलीतील भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी दिली.”
 
 
“पोयसर, जनतानगर पादचारी पुलाचा लोकार्पण सोहळा नुकताच आमदार भातखळकर यांच्या हस्ते झाला. या पादचारी पुलामुळे पोयसरवासीयांना दिलासा मिळणार आहे. पोयसर नदीवर बनलेला हा पादचारी पूल म्हणजे जनतानगर आणि कांदिवली रेल्वेस्थानकाला जोडणारा दुवा होता. दररोज शेकडो नागरिक कांदिवली रेल्वेस्थानकाला जाण्यासाठी याच पादचारी पुलाचा वापर करत. आमदार भातखळकर यांनी पुढाकार घेऊन पूलनिर्मितीचा विडा उचलला. या कामातही अनेक अडचणी आल्या. हा पादचारी पूल उभारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे एक सल्लागारही नेमण्यात आला होता. नवीन पादचारी पुलाचा आराखडाही सल्लागाराने सादर केला. मात्र आराखड्याप्रमाणे काम करायचे झाल्यास एकीकडे पोयसर नदी, तर दुसरीकडे पोयसरमधल्या आखूड गल्ल्या यामुळे जागेची कमतरता भेडसावत होती. तसेच पुलाच्या बांधकामासाठी लागणारे सामान इच्छित ठिकाणी नेण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नव्हता, असेही ते म्हणाले.”
 
 

 
 
 
“अखेर आमदार भातखळकरांनी सीओडी प्रशासनाशी याविषयी चर्चा केली आणि सामानाची ये-जा करण्यासाठी लागणाऱ्या गाड्यांना सीओडी परिसरातून मार्ग मिळवून द्यावा, अशी मागणी सीओडी प्रशासनाकडे केली. अखेर या मागणीस अनुकूल प्रतिसाद देत सीओडी परिसरातून गाड्यांची ये-जा करण्यासाठी परवानगी देण्यात आली. आज हा पादचारी पूल सर्वसामान्य जनतेसाठी खुला झाल्याने नागरिकांची सोय होणार आहे. या पुलामुळे आनंदित झालेल्या नागरिकांनी आमदार अतुल भातखळकरांचे आभार मानले. या लोकार्पण कार्यक्रमास नगरसेवक शिवकुमार झा आणि नगरसेविका सुनीता यादव, मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.”
 
 
 

 
 
 
 
 
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

पूरबाधित कुटुंबियांच्या घरी घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/29/Chandrakant-Patil-s-helping-to-the-potter-community.html
 
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

पूरबाधित कुटुंबियांच्या घरी घुमणार ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!

https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/29/Chandrakant-Patil-s-helping-to-the-potter-community.html

Continue reading

महाराष्ट्रात भरदिवाळीत अवकाळी पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र आणि केरळ-कर्नाटक किनाऱ्यावरील लक्षद्वीप क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. पुढील 24 तासांत ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजेच बंगालच्या उपसागरावर सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर...

उपेक्षितांना सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कारीत करा!

जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण ही आजच्या काळातील अत्त्यावश्यक बाब आहे. अनेकांना आर्थिक परिस्थितीसह विविध कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. समाजातल्या अशा सगळ्या घटकांपर्यंत शिक्षणाची ज्योत घेऊन जाणे, त्यांना केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कारीत करणे हेच आपल्या जीवनाचे धेय्य असल्याचे...
Skip to content