HomeArchiveकृषी अभ्यासक्रमात फेरपरीक्षा...

कृषी अभ्यासक्रमात फेरपरीक्षा उत्तीर्णांना संधी द्या – निरंजन डावखरे

Details
कृषी अभ्यासक्रमात फेरपरीक्षा उत्तीर्णांना संधी द्या – निरंजन डावखरे

    04-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
जुलैमध्ये झालेल्या बारावीच्या फेरपरीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेशाची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले यांच्याकडे केली आहे.
 
 
राज्य सरकारच्या उच्च तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. त्याच धर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्यावी, असा आग्रह आमदार डावखरे यांनी धरला. त्यावर डवले यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली.
 
 
राज्यात बारावीच्या जुलैमध्ये घेण्यात आलेल्या फेरपरीक्षांचा (पुरवणी परीक्षा) २३ ऑगस्ट रोजी निकाल लागला. मात्र, कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेश प्रक्रियेची मुदत तत्पूर्वीच संपुष्टात आल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता आले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे. राज्यात अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ ऑगस्ट २०१९च्या परिपत्रकान्वये शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये रिक्त झालेल्या जागांवर फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घ्यावा. यासंदर्भात पुणे येथील महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च संस्थेला आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. कृषी विभागात करीयर करण्याची इच्छा असलेल्या फेरपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, असेही ते म्हणाले.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो
 
“जुलैमध्ये झालेल्या बारावीच्या फेरपरीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रवेशाची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले यांच्याकडे केली आहे.”
 
 
“राज्य सरकारच्या उच्च तंत्रशिक्षण विभागांतर्गत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली. त्याच धर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ द्यावी, असा आग्रह आमदार डावखरे यांनी धरला. त्यावर डवले यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली.”
 
 
“राज्यात बारावीच्या जुलैमध्ये घेण्यात आलेल्या फेरपरीक्षांचा (पुरवणी परीक्षा) २३ ऑगस्ट रोजी निकाल लागला. मात्र, कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेश प्रक्रियेची मुदत तत्पूर्वीच संपुष्टात आल्यामुळे राज्यात हजारो विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता आले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती आहे. राज्यात अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ ऑगस्ट २०१९च्या परिपत्रकान्वये शिल्लक राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर कृषी विभागांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये रिक्त झालेल्या जागांवर फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घ्यावा. यासंदर्भात पुणे येथील महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अॅग्रीकल्चर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च संस्थेला आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. कृषी विभागात करीयर करण्याची इच्छा असलेल्या फेरपरीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही, असेही ते म्हणाले.”

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content