HomeArchiveस्वा. सावरकर स्मारकाचे...

स्वा. सावरकर स्मारकाचे शौर्य, विज्ञान, स्मृतिचिन्ह पुरस्कार वितरीत!

Details
“स्वा. सावरकर स्मारकाचे शौर्य, विज्ञान, स्मृतिचिन्ह पुरस्कार वितरीत!”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 136 व्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शौर्य पुरस्कार किर्तीचक्र विजेते एस. डब्ल्यू. आर. विजय कुमार यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला तर ऐरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे संचालक, इस्त्रो, डीआरडीओ, आयआयटी (मुंबई)चे संशोधक डॉ. गिरीश देवधरे यांना विज्ञान पुरस्कारानं सन्मानित केले गेले. स्मृतीचिन्ह पुरस्कार वडोदरा येथील निवृत्त कर्नल विनोद फळणीकर आणि लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना प्रदान करण्यात आला.

 

सावरकरांसारख्या महापुरूषाचे विचार साहित्याच्या माध्यमातून अमर राहणार आहेत. कारण त्याचा पायाच सर्वार्थाने मजबूत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली. केवळ देशासाठी त्यांचे क्रांतीकार्य आहे. यंदाची झालेली निवडणूक ही चौथी पानिपतची लढाईच आहे. भारताचे तुकडे करणाऱ्यांच्या विरोधात ही निवडणूक होती. या लढाईत झालेला पराभव हा अब्दालीला बोलावणाऱ्यांचा होता. 26/11 ला हल्ला घडवून आणणाऱ्यांचा होता, असे विचार `रॉ’चे निवृत्त अधिकारी आर. एस. एन. सिंह यांनी स्वा. सावरकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमात `स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रवाद’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.

 

यावेळी हे मृत्युंजय नाटकाचे प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे सुनील वालावलकर आणि साधना वालावलकर तसेच स्वातंत्र्यवीर दौड 2019 चे यशस्वी आयोजन करणारे विज्ञानेश मासावकर व वैदेही मासावकर या दोन्ही दांपत्यांना विशेष सन्मानित करण्यात आले. स्मारकाचे अध्यक्ष अरूण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, पदाधिकारी, विश्वस्त तसेच नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 136 व्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने शौर्य पुरस्कार किर्तीचक्र विजेते एस. डब्ल्यू. आर. विजय कुमार यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला तर ऐरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे संचालक, इस्त्रो, डीआरडीओ, आयआयटी (मुंबई)चे संशोधक डॉ. गिरीश देवधरे यांना विज्ञान पुरस्कारानं सन्मानित केले गेले. स्मृतीचिन्ह पुरस्कार वडोदरा येथील निवृत्त कर्नल विनोद फळणीकर आणि लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर यांना प्रदान करण्यात आला.

 

सावरकरांसारख्या महापुरूषाचे विचार साहित्याच्या माध्यमातून अमर राहणार आहेत. कारण त्याचा पायाच सर्वार्थाने मजबूत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका बजावली. केवळ देशासाठी त्यांचे क्रांतीकार्य आहे. यंदाची झालेली निवडणूक ही चौथी पानिपतची लढाईच आहे. भारताचे तुकडे करणाऱ्यांच्या विरोधात ही निवडणूक होती. या लढाईत झालेला पराभव हा अब्दालीला बोलावणाऱ्यांचा होता. 26/11 ला हल्ला घडवून आणणाऱ्यांचा होता, असे विचार `रॉ’चे निवृत्त अधिकारी आर. एस. एन. सिंह यांनी स्वा. सावरकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमात `स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रवाद’ या विषयावर बोलताना व्यक्त केले.

 

यावेळी हे मृत्युंजय नाटकाचे प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे सुनील वालावलकर आणि साधना वालावलकर तसेच स्वातंत्र्यवीर दौड 2019 चे यशस्वी आयोजन करणारे विज्ञानेश मासावकर व वैदेही मासावकर या दोन्ही दांपत्यांना विशेष सन्मानित करण्यात आले. स्मारकाचे अध्यक्ष अरूण जोशी, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, पदाधिकारी, विश्वस्त तसेच नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.”
 
 

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content