Homeन्यूज ॲट अ ग्लांसएकीकृत पेन्शन योजनेच्या...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2025पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

याकरीता सर्व संबंधित एनपीएस ग्राहकांनी:

1.  त्यांनी आपली यूपीएस विनंती सीआरए प्रणालीद्वारे ऑनलाइन दाखल करावी;

किंवा

2. संबंधित नोडल कार्यालयात 30.11.2025 रोजी किंवा त्यापूर्वी योग्यरित्या भरलेला प्रत्यक्ष अर्ज सादर करावा.

नोडल कार्यालयांमार्फत सर्व विनंत्यांवर विहित प्रक्रियेनुसार प्रक्रिया करण्यात येईल. यूपीएसअंतर्गत मिळणाऱ्या महत्त्वाच्या फायद्यांमध्ये पर्याय बदलणे, करसवलत, राजीनामा आणि निवृत्तीनंतरचे अनिवार्य फायदे आणि इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांना आणि माजी निवृत्त होऊ घातलेल्यांना एनपीएसअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी त्यांचे यूपीएस अर्ज वेळेत सादर करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

यूपीएसचा पर्याय निवडल्यास, कर्मचाऱ्यांना नंतर, अर्थात त्यांची तशी इच्छा असल्यास पुन्हा एनपीएसचा पर्याय निवडण्याची मुभा कायम राहील.

Continue reading

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन मंगळवारी सीरियाच्या दमास्कस दौऱ्यावर होते. या दौऱ्यात ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीकरीता निघाल्यानंतर ते उतरलेल्या हॉटेलच्या जवळ दोन बॉम्बस्फोट झाले. हे स्फोट मॅक्रॉन यांच्यावरील अयशस्वी हल्ला असल्याचे मानले जात आहे. असद राजवट पडल्यानंतर सीरियाला भेट देणारे...

वाहू लागला मुंबईकरांची तहान भागवणारा पहिला तलाव!

मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आणि मुंबईतच असणाऱ्या दोन तलावांपैकी एक पालिकेचा ‘विहार’ तलाव आज, ७ जुलैला रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला आहे‌. हा तलाव गेल्या वर्षी १८ ऑगस्टला पूर्ण भरुन वाहू लागला होता. सन १८५९मध्ये...
Skip to content