Homeन्यूज अँड व्ह्यूजयंदाच्या पावसातही ठाण्यातल्या...

यंदाच्या पावसातही ठाण्यातल्या आनंदाश्रम परिसराची रडगाथा सुरूच!

पावसाळा सुरु झाला की ठाणे शहर व आसपासच्या भागातील विविध रस्त्याच्या कहाण्यांनी वर्तमानपत्रे भरून जात असतात. (तसे पाहिले तर इतर शहरांमध्येही अशीच रडकथा असते.) ठाणे महापालिकेतील सत्ताकेंद्राचे महत्त्वाचा बिंदू असलेल्या ‘आनंदाश्रम’ परिसरातील रस्त्यांचीही अशीच रडकथा आहे. वरवर पाहता रस्ता ठीक वाटतो. परंतु पावसाळ्यात त्याचे खरे स्वरूप उघड झाले आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जो पॅसेज निर्माण केलेला आहे तो एकदम बकवास आहे. हा पॅसेज गेल्या काही वर्षांत नव्याने केला गेलाच नसल्याची माहिती आली आहे.

आश्रमाशेजारी पारशी जनसमुदयाचा भूखंड आहे. त्याचे प्रवेशद्वारही रद्दड आहे. लोकनेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूस एक नवी इमारत उभी राहिली आहे. या इमारतीसाठी काही सुविधा देणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार रस्त्याच्या मधोमध खड्डे खणून या सुविधा देण्यात आल्या. याबाबत आक्षेप नाही. परंतु नंतर हा रस्ता संबंधितांनी जवळजवळ 15/20 दिवस ठीक

केलेला नव्हता. अखेर तो केला गेला. पण तो समतल नाही. त्यामुळे नको तेथे ‘जर्क’ बसत आहेत. आश्रमातून तालावपाळीच्या दिशेने जाणारा फुटपाथ आश्रमाच्या हद्दीपर्यंत उत्तम आहे. मात्र इतरत्र बकवास आहे. महापालिका चालवणाऱ्या पक्षनेत्याला हा सर्वच फूटपाथ चकाचक करायचा होता असे नागरिकांचे मत आहे.

मार्केट सुरु होतानाच्या रस्त्यावर थोडा पाऊस पडला तरी पाणी तुंबते! गेली अनेकवर्षे यावर उपायच शोधला गेलेला नाही. तीच गत वाहतूक चौकीच्या बाजूला असलेल्या मैदानाची झाली आहे. मैदानात तर चिखल आहेच. परंतु प्रवेशमार्गाचीही हालत झालेली आहे. तसेच ठाणे स्थानकाकडे जाणाऱ्या सॅटिस पुलाखालील रस्त्यावर पाणी तुम्बण्याची समस्या अजूनही सुरूच आहे. (तालावपळीच्या समोरील बाजूस) आता सत्ताकेंद्र असलेल्या आनंदाश्रम परिसरातील उण्यापुऱ्या 100-150 पावलांत महापालिकेच्या अशा कारभाराचा अनुभव येत असेल तर घोडबंदर रोड, कोपरी, माजिवाडा, आनंद नगर, लोकमान्य नगर, कोलशेत, ढोकाळी नाका आदी परिसरात काय अनुभव येत असतील याचा विचारच केलेला बरा!

छायाचित्र मांडणीः सोनाली वऱ्हाडे

Continue reading

माध्यमांना ठाकरेंच्या शिवसेनेचे का बरे वावडे?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दाकल झाले. या प्रक्रियेत गेल्या चार दिवसांपासून विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एक सवाल विचारला गेला- उबाठाचे प्रवक्ते पत्रकारांना वा वृत्तवाहिन्यांना उपलब्ध का नसतात? त्याबाबत निरीक्षणातून हाती आलेली...

‘केइएम’मध्ये मदत कक्षालाच हवी मदत! तपासायला डॉक्टर मिळाला तर उत्तमच!!

मुंबई महापालिकेच्या प्रमुख समजल्या जाणाऱ्या केइएम रुग्णालयात डॉक्टरांसहित कर्मचारी-कामगारांमध्ये सुमारे २० टक्के इतकी मोठी कपात करण्यात आली असून मोडकळीस आलेले स्ट्रेचर्स वगैरे सामान गोदमात ढकलून देण्यासाठीही कामगार नसल्याची संतापजनक माहिती हाती आली आहे. अपघात विभागातील डॉक्टरांची संख्या तर एक-दोन...

मुंबई बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड अंमली पदार्थांच्या फॅक्टरीमागे?

मुंबईच्या आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या समोरच्या बाजूसच असलेल्या घास गल्लीतील अमली पदार्थांचा कारखाना नार्कोटिक्स विभागाने उद्ध्वस्त केल्यानंतर गेले सुमारे पाच-सहा दिवस दक्षिणमध्य मुंबईतील अनेक भागांना भेटी दिल्यानंतर एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत आहे की, या अमली पदार्थांच्या व्यापार व कारखान्यांमागे मुंबईत...
Skip to content