Homeडेली पल्सराज्य सरकारी अधिकाऱ्यांचे...

राज्य सरकारी अधिकाऱ्यांचे नेते ग. दि. कुलथे यांचे निधन

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांचे काल, सोमवारी रात्री नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने नवी मुंबईच्या नेरूळ येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. राज्य सरकारी अधिकाऱ्यांच्या संघटनेचे मार्गदर्शक म्हणून ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. मात्र, राज्य सरकारी कर्माचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षांवरून ६० करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न त्यांच्या हयातीत फलद्रूप होऊ शकले नाहीत.

गेल्या ५० वर्षाँच्या संघटनात्मक वाटचालीत त्यांनी विक्रीकर कर्मचारी-अधिकारी संघटना, राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनांचे  नेतृत्व करताना विविध पदांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे. राज्य शासनाच्या सेवेतील तब्बल ७२ खात्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनांची शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार म्हणून ते तहहयात कार्यरत होते. १९७० च्या दशकात त्यांनी विक्रीकर कर्मचारी संघटनेतून सुरू केलेली प्रवासगाथा पुढे विविध मध्यवर्ती कर्मचारी संघटनांमध्ये नेतृत्त्व करत अखेर “महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ” या शिखर संघटनेच्या स्थापनेपर्यंत पोहोचली. कोणत्याही प्रश्नात दोन्ही बाजू समजून घेऊन तोडगा काढणे, हे त्यांचे वैशिष्ट्यं होते. त्यांनी २०पेक्षा अधिक कर्मचारी संघटनांना एकत्र आणले. राज्यस्तरीय चर्चासत्र, प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून अनेक नेतृत्त्वांना संधी दिली. प्रशासन आणि कर्मचाऱ्यांतला संवाद सतत चालू राहवा यासाठी सांघिक बैठका व तंत्रशुद्ध सादरीकरणाचा आग्रह त्यांनी धरला.

कुलथे यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बुनियाद को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, दुसरा मजला, सेक्टर १५ , नेरूळ (पूर्व), नवी मुंबई येथे सकाळी ९ ते १२.३० दरम्यान ठेवण्यात येणार आहे. पार्थिवावर दुपारी १.०० वाजता नेरूळ स्मशानभूमी, सेक्टर-४, नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई येथे अंत्यसंस्कार होतील. ग. दि. कुलथे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content