Homeन्यूज ॲट अ ग्लांसवक्फनंतरची आज पहिली...

वक्फनंतरची आज पहिली जुम्मा नमाज! ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त!!

वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा केल्यानंतर आज पहिल्यांदाच मुसलमानांकडून पढली जाणारी पहिली जुम्माची नमाज असून एकूण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशातल्या अनेक भागात मुस्लीम मोहल्ल्याच्या परिसरात पोलीसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे.

वक्फ बोर्डाच्या कायद्यात झालेल्या सुधारणांना बहुतांशी सर्वच मुस्लीम संघटनांनी तसेच विरोधी राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. या सुधारणांविरूद्ध आजच्या नमाजनंतर देशभरात मुसलमानांनी निदर्शने करावी, असे आवाहन अनेक मुस्लीम संघटनांनी तसेच त्यांच्या धर्मगुरूंनी केले आहे. त्यामुळे आता नमाज संपल्यानंतर मुसलमानांकडून निदर्शने केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार तसेच पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये ठिकठिकाणी पोलिसांनी ध्वजसंचलन केले. अनेक ठिकाणी राज्य राखीव पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

अनेक मुस्लीम संघटनांनी तसेच व्यक्तींनी वक्फ बोर्ड कायद्याच्या सुधारणांविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून या सर्व याचिकांवर एकत्रितपणे १६ एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या सुधारणांविरूद्ध सह्यांची मोहीमही राबविण्यात येत असून सुमारे एक कोटी सह्या याकरीता गोळा केल्या जाणार आहेत.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content