Skip to content
Homeचिट चॅटश्री मावळी राज्यस्तरीय...

श्री मावळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २५ एप्रिलपासून

ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवजयंती उत्सवानिमित्त राज्य पातळीवरील पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा शुक्रवार, २५-०४-२०२५ ते मंगळवार, २९-०४-२०२५ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.

या स्पर्धेत एकूण रू. ५,००,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. पुरुष गटात विजेत्या संघाला ₹ १,००,०००/-, उपविजेत्या संघाला ₹ ७५,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹ २५,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. महिला गटात विजेत्या संघाला ₹ ५५,०००/-, उपविजेत्या संघाला ₹ ४४,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹ २२,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरुष व महिला गटात उत्कृष्ट खेळाडूस ₹ १०,०००/-, उत्कृष्ट चढाईपट्टू खेळाडूस ₹ ५,०००/- व उत्कृष्ट पक्कड करणाऱ्या खेळाडूस ₹ ५,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट खेळाडूस ₹ २,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे प्रवेशअर्ज श्री मावळी मंडळ कार्यालय (ठाणे) व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या maharashtrakabaddi.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे अर्ज श्री मावळी मंडळ कार्यालय, ठाणे येथे शुक्रवार, १८/०४/२०२५पर्यंत स्वीकारले जातील.

Continue reading

‘सावली’वर सावली.. तीही कडक ऊन नसताना!

राज्यविधिमंडळाच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात विधान परिषदेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते अनिल परब यांनी महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा मागताना मुंबईतल्या कांदिवलीत असलेला 'सावली' हा डान्स बार त्यांच्या मातोश्रींचा असल्याचा आरोप केला. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी येथे छापा टाकून...

१९ सप्टेेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘कुर्ला टू वेंगुर्ला’!

गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान, दळणवळण, आर्थिक स्थिती, शिक्षणात झालेल्या बदलांसह नव्या पिढीच्या आशा-आकांक्षाही बदलल्या आहेत. ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेत एका लग्नाची रंजक गोष्ट 'कुर्ला टू वेंगुर्ला' या चित्रपटातून उलगडणार आहे. अभिनेता प्रल्हाद कुडतरकर, वीणा जामकर, वैभव मांगले...

वस्ताद वसंतराव पाटील यांना गुरुवर्य मल्लगुरु पुरस्कार प्रदान

प्रतिष्ठा फाऊंडेशन आणि गुरुवर्य सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवर्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५चे आयोजन राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर येथे नुकतेच करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आले. त्यामध्ये...