Homeचिट चॅटश्री मावळी राज्यस्तरीय...

श्री मावळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा २५ एप्रिलपासून

ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवजयंती उत्सवानिमित्त राज्य पातळीवरील पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा शुक्रवार, २५-०४-२०२५ ते मंगळवार, २९-०४-२०२५ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.

या स्पर्धेत एकूण रू. ५,००,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. पुरुष गटात विजेत्या संघाला ₹ १,००,०००/-, उपविजेत्या संघाला ₹ ७५,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹ २५,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. महिला गटात विजेत्या संघाला ₹ ५५,०००/-, उपविजेत्या संघाला ₹ ४४,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹ २२,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरुष व महिला गटात उत्कृष्ट खेळाडूस ₹ १०,०००/-, उत्कृष्ट चढाईपट्टू खेळाडूस ₹ ५,०००/- व उत्कृष्ट पक्कड करणाऱ्या खेळाडूस ₹ ५,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट खेळाडूस ₹ २,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे प्रवेशअर्ज श्री मावळी मंडळ कार्यालय (ठाणे) व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या maharashtrakabaddi.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे अर्ज श्री मावळी मंडळ कार्यालय, ठाणे येथे शुक्रवार, १८/०४/२०२५पर्यंत स्वीकारले जातील.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content