Homeपब्लिक फिगरप्रकल्प रद्द करायला...

प्रकल्प रद्द करायला मी काही उद्धव ठाकरे नाही!

प्रकल्प स्थगित करायला मी काही उद्धव ठाकरे नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा)चे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावरील भाषणांना उत्तर देताना फडणवीस बोलत होते. गेल्या काही दिवसांत प्रकल्प स्थगितीच्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत, याकडे लक्ष वेधून फडणवीस म्हणाले की, प्रकल्प स्थगित करायला मी काही उद्धव ठाकरे नाही. त्यांच्या या वाक्यावर सत्ताधारी महायुती सरकारच्या घटक पक्षांमधील सदस्यांनी बाके वाजवून दाद

ठाकरे

दिली. स्थगिती दिले जात असलेले प्रकल्प कशामुळे स्थगित केले जातात, याबद्दल फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षातील सदस्यांनाही ही गोष्ट माहीत आहे की आपण अनेकदा प्रकल्प करतो. पण त्यात काही बाबी नंतर आढळून येतात. त्यामुळे त्याबद्दल निर्णय घ्यावे लागतात.

याआधीच्या एकनाथ शिन्दे यांच्या नेतृत्त्वातील सरकारमधील काही निर्णयांबद्दल ते म्हणाले की, काही निर्णयांबद्दल स्थगिती दिली आहे आणि प्रत्येक स्थगिती मुख्यमंत्री म्हणून मी दिलेली नाही. काही प्रकल्पांमधे विभागीय आयुक्त पातळीवर किंवा काही प्रकल्पांसंदर्भात केंद्राच्या निकषांमधील बदलांमुळे स्थगिती द्यावी लागली आहे. पण तरीही प्रत्येक निर्णयाच्या वेळी फडणविसांचा शिन्दे यांना दणका, अशा बातम्या दिल्या जातात. प्रकल्प रद्द करत सुटायला मी काही उद्धव ठाकरे नाही आणि शिन्दे यांच्या नेतृत्त्वातील सरकारमध्ये झालेल्या प्रत्येक प्रकल्पात मी आणि अजित पवारही सहभागी होतो. त्यामुळे ती सामूहिक जबाबदारीच होती आणि आजही आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Continue reading

उत्तर प्रदेशातले शेखा झील पक्षी अभयारण्य झाले ‘रामसर स्थळ’!

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातल्या अलिगढमधल्या शेखा झील पक्षी अभयारण्याला ‘रामसर स्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्याचे घोषित केले. यामुळे भारतातल्या रामसर स्थळांची एकूण संख्या 99 झाली आहे. उत्तर प्रदेशात ही संख्या 12पर्यंत पोहोचली आहे. “उत्तर प्रदेशने हा...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने "व्हीएम फ्रेम्स" या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने...

आता पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेसाठी अंतिम वर्षाचे विद्यार्थीही पात्र

युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढवण्यासाठी केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने, पंतप्रधान प्रशिक्षणार्थी योजनेच्या प्रायोगिक टप्प्यावर, पात्रता निकषात बदल केले आहेत. त्यानुसार, आता पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थीही याकरीता पात्र होतील. यामुळे, विद्यार्थ्यांना देशातल्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये संरचनात्मक, प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाच्या...
Skip to content