Homeकल्चर +'आरडी'तलं धमाल गाणं...

‘आरडी’तलं धमाल गाणं ‘वढ पाचची..’ लाँच

एका चुकीमुळे आयुष्य बदलणाऱ्या कथानकावरील ‘आरडी’ चित्रपटाच्या टीजरनं चित्रपटसृष्टीत चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. आता या चित्रपटातलं “वढ पाचची..” हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून, २१ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

“वढ पाचची” हे अतिशय धमाल गाणं आहे. ‘पार्टी साँग’ म्हणता येईल असं हे गाणं आहे. गीतकार मंदार चोळकरलिखित कॅची शब्दरचना, वरूण लिखाते यांचे ताल धरायला लावणारं संगीत आणि प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजामुळे हे गाणं प्रत्येकाला नाचायला लावणारं आहे. आजवर अनेक चित्रपटांतून पार्टी साँग आली असली, तरी ‘आरडी’ चित्रपटातलं “वढ पाचची..” हे गाणं आणखी वेगळं आणि मनोरंजक आहे.

साद एंटरटेन्मेंट, कमल एंटरप्रायझेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखाते यांनी संगीतदिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Continue reading

अजितदादांच्या स्मरणार्थ कबड्डी स्पर्धेत बालवीर स्पोर्ट्स, अंबिका सेवा विजेते

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईतल्या कर्ला येथील हनुमान क्रीडा मंडळ, गौरीशंकर क्रीडा मंडळ आणि कुर्ला क्रीडा केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी मैदानात आयोजित कुमार गट, प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे बालवीर...

पार्किन्सनमध्ये चालण्यात अडथळा येण्यापूर्वीच मिळणार इशारा

मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने पार्किन्सन आजारामध्ये होणाऱ्या फ्रीझिंग ऑफ गेट (एफओजी) समस्येचे भाकीत करण्यासाठी नाविन्यपूर्ण आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (एआय) प्रोजेक्‍टची घोषणा केली आहे. जसलोक हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरीचे संचालक डॉ. परेश दोशी या उपक्रमाचे नेतृत्त्व करत आहेत. तसेच, फ्रान्‍समधील पॅरिस...

डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या ‘निळाई’चे प्रकाशन

भरारी प्रकाशन, मुंबई आयोजित प्रसिद्ध कवयित्री डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या 'निळाई' या नवीन काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईतील विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील मान्यवरांची आणि रसिक श्रोत्यांची विशेष उपस्थिती लाभली होती....
Skip to content