Monday, February 3, 2025
Homeन्यूज ॲट अ ग्लांसशेअर बाजारात पहिल्या...

शेअर बाजारात पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात!

बजेटनंतरच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराच्या व्यवहारात पहिल्या अवघ्या पाच मिनिटांत सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला. त्यामुळे या पहिल्या 5 मिनिटांत गुंतवणूकदारांचे तब्बल 5 लाख कोटींचे नुकसान झाले. कार्पोरेट क्षेत्राची बजेटने निराशा केल्याचे मानले जात आहे. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अपेक्षित गुंतवणूक न झाल्याचा हा फटका मानला जात आहे. सरकारने अपेक्षित भांडवली गुंतवणुकीपेक्षा वित्तीय तूट नियंत्रित राखण्यावर जोर दिल्यानेही बाजाराची काहीशी निराशा झाली आहे. त्यामुळे सुरूवातीलाच सेन्सेक्स गडगडल्याचे समजते.

रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर

डॉलरच्या तुलनेत रुपयाची 87.15 या विक्रमी नीचांकी पातळीपर्यंत झालेली घसरण आणि कमजोर परदेशी संकेत यामुळे भारतीय बाजारात सुरुवातीला घसरण झाली असावी, असे सांगितले जात आहे. अर्थात पहिल्या अर्ध्या तासातच खालच्या पातळीवरून सेन्सेक्स 300 अंशांहून अधिक सुधारून वर आला. बँक निफ्टीही खालच्या पातळीवरून 350 अंश वर आला. निफ्टी मिडकॅप 500 तर स्मॉल कॅप इंडेक्सही खालच्या पातळीवरून 200 अंक सुधारली. निफ्टीमध्येही खालच्या पातळीवरून 75 अंशांची सुधारणा झाली. मात्र, ही रिकव्हरी फार काळ टिकू शकली नाही आणि सर्व निर्देशांक पुन्हा दहाच्या सुमारास दिवसाच्या नव्या नीचांकी पातळीवर आले.

बाजार उघडताच विक्रीचा जोरदार मारा

सोमवार, 3 फेब्रुवारी रोजी सुरुवातीच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजाराला लक्षणीय तोटा सहन करावा लागला. कमकुवत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला आणि निफ्टी 50 निर्देशांक 23,250च्या खाली घसरला. सेन्सेक्स शनिवारच्या 77,505.96 च्या आधीच्या क्लोजिंगविरुद्ध 700 अंकांनी घसरून 76,791.09च्या पातळीवर गेला. निफ्टी 50 त्याच्या मागील 23,482.15च्या बंदच्या तुलनेत 23,319.35वर उघडला आणि एक टक्क्याने घसरून 23,246.55वर आला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक घसरल्याने मिड आणि स्मॉल कॅप विभागांमध्ये विक्रीचा जोर वाढला. सकाळी 9:20च्या सुमारास, सेन्सेक्स 671 अंक किंवा 0.87 टक्क्यांनी घसरून 76,835वर आणि निफ्टी 50 219 अंकांनी किंवा 0.93 टक्क्यांनी घसरून 23,263वर होता. BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल मागील सत्रातील ₹ 424 लाख कोटींवरून जवळपास ₹ 419 लाख कोटींवर घसरले. ज्यामुळे गुंतवणूकदारांना 5 मिनिटांत सुमारे ₹ 5 लाख कोटींचे नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

श्री मावळी मंडळाच्या खो-खो स्पर्धेत ज्ञानविकास,विहंग विजयी

ठाण्यातील श्री मावळी मंडळ संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित प्रथम विभागीय खो-खो स्पर्धेच्या महिला गटात ज्ञानविकास फाउंडेशन संघ (ठाणे) व पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र (ठाणे) या संघांनी विजेतेपद पटकावले. महिला गटातील अंतिम सामन्यात ठाण्याच्या ज्ञानविकास फाउंडेशन संघाने ठाण्याच्या रा....

महाराष्ट्रात सुरू होणार देशातले पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ

महाराष्ट्रात देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, असे राज्याचे तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले. नवे विद्यापीठ AI आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला...

जयवंत दळवी जन्मशताब्दी वर्षानिमित्त दोन दिवसांचा ‘साहित्यरंग’!

मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने साहित्यातील प्रेमरंग, या विषयावर साहित्यरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव येत्या शनिवारी, ८ फेब्रुवारी आणि रविवारी, ९ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या गोखले सभागृहात होईल. ८ फेब्रुवारीला थोर साहित्यिक जयवंत दळवी यांच्या...
Skip to content