Homeन्यूज ॲट अ ग्लांसदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोलांटउडी! 

दारू घोटाळ्यात अडकलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या अटींवर कोणतेही भाष्य न करता जनतेचा कौल मागण्यासाठी आपण मुख्यमंत्रीपद सोडत असल्याचा आव आणत त्यांनी जनतेच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल जामीनावर सुटल्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत दोन दिवसात आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. दिल्लीची जनता त्याचप्रमाणे भारताची जनता ठरवेल की मी दोशी आहे की नाही? आणि तोपर्यंत मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार नाही, अशी घोषणा करत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची वाहवा मिळवली. वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांना जामीन याच मुद्द्यावर मिळाला आहे की, ते मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जाणार नाहीत, मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही फायलीवर सही करणार नाहीत, अत्यंत महत्त्वाची अशी जर फाईल असेल तरच त्यावर ते सही करतील. जर जामीन देतानाच न्यायालयाने अशा अटी घातल्या असतील तर ते मुख्यमंत्री म्हणून करणार तरी काय? त्यापेक्षा फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाताना जनतेकडून सहानुभूती मिळवावी असा प्रयत्न केजरीवाल यांनी केला असल्याचे कळते.

आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दोन दिवसांत देत आहोत आणि आपली मागणी आहे की दिल्लीची विधानसभा बरखास्त करावी आणि फेब्रुवारीऐवजी महाराष्ट्राबरोबरच दिल्लीच्याही विधानसभा निवडणुका घ्याव्यात आणि जर आपली मागणी मान्य झाली नाही तर आपल्या जागी कोण असेल हे पक्षाचे विधिमंडळ सदस्य ठरवतील असे त्यांनी जाहीर केले. विधिमंडळ पक्षातले आमदार केजरीवाल यांच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यामुळे केजरीवाल जो निर्णय घेतील तोच निर्णय सर्व आमदारांचा असेल. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री होण्यासाठी केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य आतिशी सिंग आणि केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्याआधी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या मंत्रीपदाचा कार्यभार तसेच आम आदमी पार्टीचे इतर मंत्री यांनी जेलवारी केल्यानंतर त्यांच्या मंत्रालयांचे कार्यभार आतिशी यांनीच सांभाळला. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री केजरीवाल तुरूंगात गेल्यानंतर पक्षाची आणि मंत्रिमंडळाची बाजू मांडण्यामध्ये अतिशी यांचा मोठा सहभाग होता. मात्र याच काळात अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता याही घराबाहेर पडल्या आणि त्यांनी जाहीर सभांमध्ये भाषणे देण्यास सुरुवात केली. अरविंद केजरीवाल यांचे वजन कसं कमी होत आहे, किती ग्रामने कमी होत आहे. त्यांना डायबिटीस असताना कसं गोड खायला दिलं जात आहे, अशा पद्धतीचे आरोप करण्यामध्ये सुनीता केजरीवाल यांचा मोठा सहभाग राहिला आहे.

त्यामुळेच जर मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, हेमंत सोरेन अशा काही मुख्यमंत्र्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जायचं असेल तर अरविंद केजरीवाल येत्या दोन दिवसांत सुनिता केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवतील किंवा पुढच्या पाच वर्षांची बेगमी करण्यासाठी म्हणजे फेब्रुवारीच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी ते सुनिता केजरीवालना टाळून पक्षातल्या इतर कोणत्यातरी नेत्याला मुख्यमंत्री बनवतील असे जाणकारांचे मत आहे.

Continue reading

भायखळ्याच्या भोसले उद्यानात आजपासून ‘मुंबई पुष्पोत्सव’!

मुंबई महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळ्याच्या येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात आजपासून रविवार, ८ फेब्रुवारीपर्यंत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर आज रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील....

संगीत-नाट्य क्षेत्रातल्या रसिकांनी अनुभवले भावूक क्षण!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात झालेल्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याने उत्साहाचे आणि कलेच्या गौरवाचे वातावरण निर्माण झाले. संगीत, नाटक, साहित्य आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना यंदा मानांकित करण्यात आले, ज्यामुळे उपस्थित रसिकांनी दाद देत टाळ्यांचा कडकडाट...

सयाजी नगरी एक्सप्रेस ठरली मुंबईतली पहिली ‘कवच’धारी गाडी!

पश्चिम रेल्वेने विरार-बडोदा विभागात अपघातापासून बचाव करणारी ‘कवच 4.0’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक 20907 दादर–भूज सयाजी नगरी एक्सप्रेस, ही मुंबईतून सुटणारी कवच प्रणालीने सुसज्ज असलेली पहिली गाडी ठरली आहे. या गाडीवर हे सुरक्षा कवच बसवण्यात आले आहे....
Skip to content