Homeन्यूज ॲट अ ग्लांसमुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर...

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची ठाकरेंची पवारांना गळ

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचारातच महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.

मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. मेळाव्याला उपस्थित असलेले शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी कोणीही येथेच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा करावी, आपला त्याला पाठिंबा राहील. तशी घोषणाच आपण करू, असे ते म्हणाले.

ठाकरे

भारतीय जनता पार्टीबरोबर युतीत असताना आम्ही जो अनुभव घेतला, त्याची पुनरावृत्ती आता आम्हाला नको आहे. आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री, असे जाहीर केले जायचे. एकमेकांच्या पायावर धोंडे मारण्याकरीता आम्ही हेच धोरण वापरायचो. तुमच्या जागा जास्त आल्या तर तुमचा मुख्यमंत्री होईल, म्हणून आम्ही त्यांच्या जागा पाडायचो आणि ते आमची जागा पाडायचे असे व्हायचे. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात युतीला काहीही महत्त्व राहिले नव्हते. महाविकास आघाडीत तसे होऊ नये, म्हणून आधीच मुक्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा, असे ठाकरे म्हणाले.

राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्याला १० हजार रुपये महिना दिले जाजतात. त्यासाठी त्यांनी योजनादूत नेमले आहेत. हा लोकांचा पैसा आहे. अशा योजनांमध्ये राज्याची लूट होत आहे. अडीच वर्षे काय काम केले ते लोकांपर्यंत पोहोचवा. होऊन जाऊ दे चर्चा. तुम्ही काय केले, आम्ही काय केले यावर… लाडकी बहीण योजना आणली. पण पैसा कुठे आहे? सरकार पाडायला ५० खोके आणि लाडक्या बहिणीला फक्त १५०० रुपये दिले जात आहेत, असेही ते म्हणाले. मुस्लिम समाजाने आपल्याला भरभरून मतदान केले. कोरोनामध्ये मी या समाजासाठी काम केले. एनआरसी, सीसीए आंदोलनावेळीही आम्ही मुस्लिमांसोबत होतो. पंतप्रधान मोदी यांनी आग लावण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा बिल आणले आहे. हे विधेयक बहुमत असताना मंजूर का केले नाही? आमचे खासदार त्यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते, कारण मी दिल्लीत होतो. वक्फ बोर्ड असो किंवा हिंदू संस्थांनाच्या जागा असतील तिथे वेडवाकडे होऊ देणार नाही. वक्फ बोर्ड विधेयकाखाली तुम्ही जर त्या जमिनी तुमच्या लाडक्या उद्योगपतींना देणार असाल, तर आम्ही त्याला विरोध करू, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content