Homeन्यूज ॲट अ ग्लांसमुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर...

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची ठाकरेंची पवारांना गळ

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचारातच महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.

मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते. मेळाव्याला उपस्थित असलेले शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी कोणीही येथेच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा करावी, आपला त्याला पाठिंबा राहील. तशी घोषणाच आपण करू, असे ते म्हणाले.

ठाकरे

भारतीय जनता पार्टीबरोबर युतीत असताना आम्ही जो अनुभव घेतला, त्याची पुनरावृत्ती आता आम्हाला नको आहे. आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री, असे जाहीर केले जायचे. एकमेकांच्या पायावर धोंडे मारण्याकरीता आम्ही हेच धोरण वापरायचो. तुमच्या जागा जास्त आल्या तर तुमचा मुख्यमंत्री होईल, म्हणून आम्ही त्यांच्या जागा पाडायचो आणि ते आमची जागा पाडायचे असे व्हायचे. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात युतीला काहीही महत्त्व राहिले नव्हते. महाविकास आघाडीत तसे होऊ नये, म्हणून आधीच मुक्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा, असे ठाकरे म्हणाले.

राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्याला १० हजार रुपये महिना दिले जाजतात. त्यासाठी त्यांनी योजनादूत नेमले आहेत. हा लोकांचा पैसा आहे. अशा योजनांमध्ये राज्याची लूट होत आहे. अडीच वर्षे काय काम केले ते लोकांपर्यंत पोहोचवा. होऊन जाऊ दे चर्चा. तुम्ही काय केले, आम्ही काय केले यावर… लाडकी बहीण योजना आणली. पण पैसा कुठे आहे? सरकार पाडायला ५० खोके आणि लाडक्या बहिणीला फक्त १५०० रुपये दिले जात आहेत, असेही ते म्हणाले. मुस्लिम समाजाने आपल्याला भरभरून मतदान केले. कोरोनामध्ये मी या समाजासाठी काम केले. एनआरसी, सीसीए आंदोलनावेळीही आम्ही मुस्लिमांसोबत होतो. पंतप्रधान मोदी यांनी आग लावण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा बिल आणले आहे. हे विधेयक बहुमत असताना मंजूर का केले नाही? आमचे खासदार त्यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते, कारण मी दिल्लीत होतो. वक्फ बोर्ड असो किंवा हिंदू संस्थांनाच्या जागा असतील तिथे वेडवाकडे होऊ देणार नाही. वक्फ बोर्ड विधेयकाखाली तुम्ही जर त्या जमिनी तुमच्या लाडक्या उद्योगपतींना देणार असाल, तर आम्ही त्याला विरोध करू, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content