Homeकल्चर +अडीच दशकांनंतर अरुण...

अडीच दशकांनंतर अरुण कदम पुन्हा रंगभूमीवर!

हास्य अभिनेते आणि महाराष्ट्राची हास्यजत्राफेम कलाकार अरुण कदम जवळपास अडीच दशकानंतर पुन्हा रंगभूमीवर सक्रीय होत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून आनंदांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

भद्रकाली प्रॉड्कशन आणि प्रसाद कांबळी निर्मिती `वस्त्रहरण’ या नाटकातून ते पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आले असून या नाटकाचे पहिली तीन प्रयोग हाऊसफुल्ल झाल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्राची लोकधारा, या कार्यक्रमाने त्यांनी महाराष्ट्रातील रसिकांना आपली ओळख करून दिली.

त्यानंतर नटरंग या नाटकाने त्यांना सरी ग सरी, अशी बायको हवी, एकदा पाहवं करून, भटाच्या साक्षीने, पैसाच पैसा, भ्रमाचा भोपळा, बापाचा बाप, प्रतिक्रिया अशी नाटके मिळवून दिली.

काफिला हा त्यांचा हिंदी चित्रपटदेखील गाजला आहे. जुगाड, येरे येरे पैसा, लोणावळा बायपास, हृदयनाथ, घंटा, बाहुलीचे लगीन, धावाधाव, जनता जनार्दन अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे. हत्यार, चलो दिल्ली, थँक्स माँ अशा काही हिंदी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने ते घराघरात पोहोचले आहेत. देश-विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. आता ते पुन्हा एकदा रंगमंचावर रसिकांना हसवण्यासाठी येत आहेत. 

Continue reading

व्हाईट लोटस हॉस्पिटलतर्फे रविवारी मोफत तपासण्या शिबीर

सणासुदीच्या मोसमाच्या निमित्ताने नवी मुंबईत आरोग्यविषयक सर्वात मोठी तसेच व्यापक मोहीम सुरू करताना कळंबोली येथील व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे येत्या रविवारी, १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत विविध स्वरूपाच्या मोफत तपासणी शिबिराचे...

हा पाहा महायुती सरकारचा दुटप्पीपणा!

देशातीलच नव्हे तर जगातील शास्त्रज्ञ व वैद्यकीय तज्ज्ञ यांनी केलेल्या संशोधनाच्या आधारे कबुतरापासून माणसाच्या फुफ्फुसाला धोका निर्माण होतो, हे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने योग्य निर्णय देत यावर बंदीही आणली असतानाही, दादरला एक समुदाय कबुतरांना खायला दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला...

कोमसाप मुंबईच्या अध्यक्षपदी विद्या प्रभू; जगदीश भोवड जिल्हा प्रतिनिधी

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षपदी विद्या प्रभू यांची निवड झाली आहे. विद्यमान अध्यक्ष मनोज वराडे आणि विद्या प्रभू यांच्यात लढत झाली. त्यात विद्या प्रभू विजयी झाल्या. यावेळी मुंबई जिल्ह्याची कार्यकारिणीही निवडण्यात आली. केंदीय समितीवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जगदीश...
Skip to content