Homeचिट चॅटटपाल खात्यातल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी...

टपाल खात्यातल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी 7 ऑगस्टला अदालत

भारतीय टपाल विभागातील निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी येत्या 7 ऑगस्टला दुपारी 3 वाजता गोव्यातील पणजी येथील पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात, गोवा टपाल विभागाची (ज्यामध्ये महाराष्ट्रातील गोवा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांचादेखील समावेश आहे) टपाल विभाग निवृत्तीवेतन अदालत आयोजित केली जाणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या तक्रारींचे अर्ज विहित रूपात 26 जुलै 2024 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावेत, असे आवाहन टपाल खात्याने केले आहे.

टपाल विभागातून (टपाल विभागाचे निवृत्तीवेतनधारक) सेवानिवृत्त किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्यांच्या निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन लाभासंबंधीच्या तक्रारी तसेच ज्यांच्या निवृत्तीवेतनाच्या तक्रारी 3 महिन्यांच्या आत निकाली काढल्या गेल्या नाहीत अशा तक्रारी या निवृत्तीवेतन अदालतीमध्ये निवारणासाठी विचारात घेतल्या जातील. या टपाल निवृत्तीवेतन अदालतीमध्ये कॅट (CAT) किंवा न्यायालयात दाखल असलेली प्रकरणे, वारसाहक्क विवाद आणि धोरणासंबंधीच्या तक्रारी यासारख्या पूर्णपणे कायदेविषयक समस्यांचा समावेश असलेल्या प्रकरणांचा विचार केला जाणार नाही.

या अदालतीत भाग घेण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी महेश एन., लेखाधिकारी आणि सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी-403001 या पत्त्यावर किंवा accts.goa@indiapost.gov.in या ई-मेल पत्त्यावर आपल्या तक्रारींचे अर्ज विहित रूपात 26 जुलै 2024 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावेत. 26 जुलै 2024नंतर प्राप्त झालेल्या अर्जांवर निवृत्तीवेतन अदालतीत विचार केला जाणार नाही, असेही टपाल खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content