Homeटॉप स्टोरीइच्छुक उमेदवारांकडून काँग्रेस...

इच्छुक उमेदवारांकडून काँग्रेस उभारणार कोट्यवधींचा निधी

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले असून त्या माध्यमातून पक्षासाठी काही कोटींचा निधी उभारण्याचे ठरवले असल्याचे समजते. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती व पक्षनिधीसह १० ऑगस्ट २०२४पर्यंत प्रदेश काँग्रेसचे मुंबईतले मुख्यालय टिळक भवन कार्यालयात पोहोचतील अशा पद्धतीने पाठवावेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) नाना गावंडे यांनी केले आहे.

उमेदवारीअर्ज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई येथे व सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेला अर्ज पक्षनिधीसह टिळक भवन दादर, मुंबई येथे सादर करावा. सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांसाठी २० हजार रुपये तसेच अनुसूचित जाती, जमाती व महिला इच्छुक उमेदवारांना १० हजार रुपये पक्षनिधी अर्जासोबत भरावा लागणार आहे. जे इच्छुक उमेदवार जिल्हा काँग्रेस कमिटीकडे अर्ज करतील त्या जिल्हा काँग्रेस कार्यालयाने १० ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडे जमा झालेले अर्ज प्रदेश कार्यालयाला सादर करावेत, असे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस

विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातून किमान १० इच्छुक उमेदवार अर्ज करतात. आता तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ज्या पद्धतीने यश मिळाले ते पाहता यावेळी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या दुपटीने वा तिपटीने वाढण्याची शक्यता आहे. हे सर्व उमेदवार मागासवर्गीय वा महिला असल्याचे गृहित धरले तरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून काही लाख रूपये गोळा होतील. महाराष्ट्रात २८८ विधासभा मतदारसंघ आहेत. ही संख्या लक्षात घेतली तर या इच्छुकांच्या माध्यमातून काँग्रेस काही कोटी रूपयांचा निधी उभारणार असल्याचे दिसून येते. 

मतदारयाद्या अद्ययावत करण्यावर भर द्या..

मतदारयाद्या अद्यावत करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला असून २५ जून ते २४ जुलै २०२४ या कालावधीत मतदारयाद्यांचे पुनरिक्षण करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या विधानसभा क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदारांची नावे यादीत आहेत का? ते पाहवे. नसल्यास ती नावे पुन्हा यादीत सामाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच नाव, पत्ता यात काही बदल करावयाचा असल्यास ती सर्व कामे करून मतदारयादीत जास्तीतजास्त पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया करून घ्यावी. ज्या युवक, युवतींनी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली आहेत, त्यांची नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यावरही भर द्यावा, अशी सूचना काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रातांध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केली आहे.

Continue reading

मराठी शाळांकडील शासकीय दुर्लक्ष अत्यंत घातकी!

महाराष्ट्र शसनाने मराठी शाळांकडे केलेले दुर्लक्ष अत्यंत घातक टप्प्यावर पोहोचले आहे. नरेंद्र जाधव समितीचा फार्स आणि मुंबई महानगरपालिकेसारख्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक अनुदानित शाळा बंद पाडण्याचे कारस्थान, हा या व्यापक योजनेचाच भाग आहे. याबद्दल शासनाने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली पाहिजे. राजकीय...

पुणेकरांची करोडोंची होणारी ‘दिवाळी लूटमार’ यंदा बंद!

पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिकांची होणारी करोडो रुपयांची "दिवाळी लूटमार" यंदा बंद होणार! दरवर्षी दिवाळीत, पुण्यातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांची पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील अधिकारी-कर्मचारी असल्याचे भासवून काही भामटे आर्थिक फसवणूक करत होते. व्यावसायिक...

अकोला, अहिल्यानगर, अलिबागेतून मान्सून परतला! आज राज्यातून एक्झिट!!

राज्यातील मान्सूनच्या माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अकोला, अहिल्यानगर, अलिबाग या रेषेच्या वरील भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. आता येत्या 24 तासात मान्सूनची महाराष्ट्रातून पूर्ण एक्झिट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविला आहे. रिटर्न मान्सूनसाठी उर्वरित राज्यात वातावरण...
Skip to content