Homeपब्लिक फिगरपरदेशात भाषणे ठोकणाऱ्या...

परदेशात भाषणे ठोकणाऱ्या राहुल गांधींना ही माहिती नाही?

मुळात ईव्हीएम मशीन कुठल्याही मोबाईलला जोडला जात नाही. कोणताच ईव्हीएम मोबाइलनं ऑपरेट होत नाही. राहुल गांधी परदेशात टेक्नॉलॉजीवर भाषणं देतात. त्यांना याची माहिती नाही का?, असा सवाल शिवसेनेचे उपनेते संजय निरूपम यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे रविंद्र वायकर अवघ्या ४८ मतांनी निवडून आल्यानंतर वायकर यांच्या मेव्हण्याने निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मोबाईल फोनचा वापर करून ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून केला जात आहे. राहुल गांधी, अदित्य ठाकरे अखिलेश यादव यांनी तसे ट्विटही केले आहे. त्यानंतर निरूपम यांनी हे आरोप फेटाळून लावले.

राहुल

ईव्हीएम मोबाईलने अनलॉक केला गेला असे सांगितले जात आहे. निकालाच्या दिवशीदेखील असेच खोटे आरोप करण्यात आले. दोन हजार मतांनी अमोल कीर्तिकर जिंकले असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच नव्हते. यानंतर ईव्हीएम मशीनवर कीर्तिकर याना एक मत जास्त मिळाले म्हणून ते विजयी  म्हणून घोषणा करण्यात आली. हे सारे माध्यमांवर चालू होते. त्यावेळी पोस्टल मते मोजण्यात आलेली नव्हती. पोस्टल मते मोजल्यावर वायकर विजयी झाल्याचे स्पष्ट झाले, असे त्यांनी सांगितले.

कोणीतरी तिथे मोबाईल घेऊन गेले होते असे सांगण्यात आले आहे. आता हा मोबाईल कुणाचा होता? वायकर यांच्या मेहुण्याचा आहे का? याची चौकशी करायला हवी. एक ईव्हीएम मशीन या मोबाइलला जोडण्यात आले होते. त्यावर ओटीपी आला होता. मूळात ईव्हीएम मोबाईलला जोडताच येत नाही. त्याला इंटरनेट नसते. त्यामुळे ओटीपीने ते ऑपरेटच करता येत नाही. ज्यांना पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे तेदेखील असे बोलतात हे हास्यास्पद आहे, असे निरूपम म्हणाले.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content