Homeटॉप स्टोरीचौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात...

चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात अंदाजे ६० टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या ११ मतदारसंघात काल सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. अंतीम टक्केवारीत आणखी तीन ते चार टक्के मतांची भर पडण्याची शक्यता आहे.

नंदुरबारमध्ये ६७.१२, जळगावात ५३.६५, रावेरमध्ये ६१.३६, जालन्यात ६८.३०, औरंगाबादमध्ये ६०.७३, मावळमध्ये ५२.९०, पुण्यात ५१.२५, शिरूरमध्ये ५१.४६, अहमदनगरमध्ये ६२.७६, शिर्डीत ६१.१३ तर बीडमध्ये ६९.७४ टक्के मतदान झाले.

सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान

चौथ्या टप्प्यात काल सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरु झाले. सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ८.४३, जळगावमध्ये ६.१४, रावेरमध्ये ७.१४, जालन्यात ६.८८, औरंगाबादमध्ये ७.५२, मावळमध्ये ५.३८, पुण्यात ६.६१, शिरूरमध्ये ४.९७, अहमदनगरमध्ये ५.१३, शिर्डीत ६.८३ तर बीडमध्ये ६.७२ टक्के मतदान झाले.

सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान

११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये २२.१२, जळगावमध्ये १६.८९, रावेरमध्ये १९.०३, जालनामध्ये २१.३५, औरंगाबादमध्ये १९.५३, मावळमध्ये १४.८७, पुण्यात १६.१६, शिरूरमध्ये १४.५१, अहमदनगरमध्ये १४.७४, शिर्डीत १८.९१ तर बीडमध्ये १६.६२ टक्के मतदान झाले.

मतदान

दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ३७.३३, जळगावमध्ये ३१.७०, रावेरमध्ये ३२.०२, जालन्यात ३४.४२, औरंगाबादमध्ये ३२.३७, मावळमध्ये २७.१४, पुण्यात २६.४८, शिरूरमध्ये २६.६२, अहमदनगरमध्ये २९.४५, शिर्डीत ३०.४९ तर बीडमध्ये ३३.६५ टक्के मतदान झाले.

दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.३५ टक्के मतदान

दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ४२.३५ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ४९.९१, जळगावमध्ये ४२.१५, रावेरमध्ये ४५.२६, जालनामध्ये ४७.५१, औरंगाबादमध्ये ४३.७६, मावळमध्ये ३६.५४, पुण्यात ३५.६१, शिरूरमध्ये ३६.४३, अहमदनगरमध्ये ४१.३५, शिर्डीत ४४.८७ तर बीडमध्ये ४६.४९ टक्के मतदान झाले.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२.४९ टक्के मतदान

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले. नंदुरबारमध्ये ६०.६०, जळगावात ५१.९८, रावेरमध्ये ५५.३६, जालन्यात ५८.८५, औरंगाबादमध्ये ५४.०२, मावळमध्ये ४६.०३, पुण्यात ४४.९०, शिरूरमध्ये ४३.८९, अहमदनगरमध्ये ५३.२७, शिर्डीत ५२.२७ तर बीडमध्ये ५८.२१ टक्के मतदान झाले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content