Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात...

महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात सरासरी ६१.४४ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून ११ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:-

रायगड- ५८.१०, बारामती– ५६.०७, उस्मानाबाद- ६०.९१, लातूर- ६०.१८, सोलापूर– ५७.६१, माढा– ६२.१७, सांगली- ६०.९५, सातारा- ६३.०५, रत्नागिरी-सिंधुदूर्ग- ५९.२३, कोल्हापूर- ७०.३५ आणि हातकणंगले- ६८.०७ टक्के. ही अंदाजी टक्केवारी असून अंतीम टक्केवारी साधारण ३ ते ४ टक्क्यांनी वाढलेली असेल, असे सूत्रांनी सांगितले.

मतदान

सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान

काल सकाळी ७ वाजल्यापासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी  ६.६४  टक्के मतदान झाले. लातूरमध्ये ७.९१, सांगलीत ५.८१, बारामतीत ५.७७, हातकणंगलेमध्ये ७.५५, कोल्हापूरमध्ये ८.०४, माढात ४.९९, उस्मानाबादेत ५.७९, रायगडमध्ये ६.८४, रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये ८.१७, साताऱ्यात ७.०० तर सोलापूरमध्ये ५.९२ टक्के मतदान झाले.

सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात ११ वाजेपर्यंत सरासरी  १८.१८ टक्के मतदान झाले. लातूरमध्ये २०.७४, सांगलीत १६.६१, बारामतीत १४.६४, हातकणंगलेमध्ये २०.७४, कोल्हापुरात २३.७७, माढामध्ये १५ .११, उस्मानाबादेत १७.०६, रायगडमध्ये १७.१८, रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये २१.१९, साताऱ्यात १८.९४ तर सोलापूरमध्ये १५.६९ टक्के मतदान झाले.

दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले. लातूरमध्ये ३२.७१, सांगलीत २९.६५, बारामतीत २७.५५, हातकणंगलेत ३६.१७, कोल्हापूरमध्ये ३८.४२, माढामध्ये २६.६१, उस्मानाबादेत ३०.५४, रायगडमध्ये ३१.३४, रत्नागिरी–सिंधुदूर्गमध्ये ३३.९१, साताऱ्यात ३२.७८ तर सोलापूरमध्ये २९.३२ टक्के मतदान झाले.

मतदान

दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले. लातूरमध्ये ४४.४८, सांगलीत ४१.३०, बारामतीत ३४.९६, हातकणंगलेत ४९.९४, कोल्हापुरात ५१.५१, माढामध्ये ३९.११, उस्मानाबादमध्ये ४०.९२, रायगडमध्ये ४१.४३, रत्नागिरी–सिंधुदूर्गमध्ये ४४.७३, साताऱ्यात ४३.८३ तर सोलापूरमध्ये ३९.५४ टक्के मतदान झाले.

सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान

तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे. लातूरमध्ये ५५.३८, सांगलीत ५२.५६, बारामतीत ४५.६८, हातकणंगलेमध्ये ६२.१८, कोल्हापुरात ६३.७१, माढामध्ये ५०.००, उस्मानाबादेत ५२.७८, रायगडमध्ये ५०.३१, रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये ५३.७५, साताऱ्यात ५४.११ तर सोलापूरमध्ये ४९.१७ टक्के मतदान झाले.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content